Sand Policy : वाळू धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे

Maharashtra Sand Policy राज्य शासनाने नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध होण्यासाठी नवीन वाळू धोरण लागू केले आहे.
Sand Policy
Sand PolicyAgrowon

Nashik News : राज्य शासनाने नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध होण्यासाठी नवीन वाळू धोरण लागू केले आहे. या नवीन वाळू धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

शनिवार(ता. १३) रोजी चांदोरी (ता. निफाड) येथील गोदावरी नदी खोलीकरण व शासकीय वाळू विक्री केंद्राच्या उद्‍घाटनप्रसंगी विखे पाटील बोलत होते.

या वेळी आमदार दिलीप बनकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., नाशिक अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पाराधे, मालेगाव अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, निफाड प्रांताधिकारी हेमांगी पाटील, जिल्हा खनिकर्म अधिकारी रोहिणी चव्हाण, निफाड तहसीलदार शरद घोरपडे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Sand Policy
News Sand Policy : परभणी जिल्ह्यात ११ डेपोंवर मिळणार रेती

विखे पाटील म्हणाले, की नवीन वाळू धोरणामुळे अवैध वाळू उत्खनन व विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी मदत होणार आहे. तसेच यामुळे सामान्य नागरिकांना या धोरणानुसार ६०० रुपये ब्रास प्रमाणे वाळू मिळणार आहे.

वाळू खरेदी ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. तसेच घरकुलांसाठी लागणारी ५ ब्रास वाळू नवीन धोरणानुसार मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Sand Policy
Sand Policy Maharashtra : स्वस्तात वाळू देण्याची प्रक्रिया संथगतीने

नदीपात्रातील काढण्‍यात आलेला गाळ शेतकऱ्यांना मोफत वितरित करण्यात येणार आहे. या नवीन धोरणामुळे बेकायदेशीर वाळू विक्रीला आळा बसणार आहे.

त्यामुळे सर्व संबंधित अधिकारी यांनी या नवीन वाळू धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तत्पर राहावे, अशा सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या.

मधुकर खेलूकर, श्‍याम वायकांडे व जीवन आंबेकर यांना प्रातिनिधिक स्वरूपात ऑनलाइन वाळू वाहतूक पासचे वितरण मंत्री श्री. विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमात आमदार दिलीप बनकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी, तर आभारप्रदर्शन अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी केले.

पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबण्यासाठी मदत

राज्य शासनाने लागू केलेल्या नवीन वाळू धोरणाच्या माध्यमातून नागरिकांना वाळू स्वस्त दरात उपलब्ध होण्यासोबतच पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबण्यासाठी मदत होणार आहे.

त्याचप्रमाणे पावसाळ्यात गोदावरी नदीला येणाऱ्या पाण्यामुळे चांदोरी, सायखेडा या भागांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होते.

या ठिकाणी असलेल्या नदी खोलीकरणामुळे नदीपात्रात साठलेला गाळ काढल्याने पूरपरिस्थिती नियंत्रणात येणार आहे, असे आयुक्त गमे यांनी या वेळी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com