
तेल्हारा, जि. अकोला ः गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल (Climate Change) झाला असून, दिवसभर धुक्याची चादर (Foggy Weather) पसरलेली दिसून येत आहे. यामुळे रब्बी हंगामात सर्वाधिक लागवड (Chana Cultivation) असलेल्या हरभरा पिकाला फटका बसण्याची शक्यता शेतकरी वर्तवीत आहेत.
तेल्हारा तालुक्यात या वर्षी पावसामुळे सोयाबीन, मूग, उडीद, कपाशी, तूर पिकाचे आधीच नुकसान झाले. तुरीचे पीक आपोआप जागेवरच वाळून गेल्याने अनेकांना फटका बसला. आता वातावरण बदलामुळे हरभऱ्याचे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
तालुक्यात या वर्षी बागायती तसेच कोरडवाहू क्षेत्रात हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे. आधीच खरिपातील पिकांनी नुकसान दिल्याने रब्बीतून कसर भरून काढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. गेल्या दोन दिवसांतील ढगाळ वातावरणामुळे दिवसभर धुके पडल्यामुळे हरभरा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे.
या रब्बी हंगामात मी दहा एकर क्षेत्रांवर हरभरा पेरणी केली आहे. पिकांवर मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे. दोन दिवसांपासून वातावरण बदलामुळे आता हरभरा पीक धोक्यात आले आहे.
- सुदेश शेळके, शेतकरी, चागंलवाडी, ता. तेल्हारा, जि. अकोला
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.