
वडाळी, जि. नंदुरबार ः जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून सततचे ढगाळ हवामान (Cloudy Weather), अवकाळी पाऊस आणि थंडी कमी असल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, मका, भाजीपाॅला पिकांवर (Vegetable Crop) रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कीडनाशकांची फवारणी करीत पिके वाचविण्याचा प्रयत्न शहादा तालुक्यातील वडाळीसह परिसरातील शेतकरी करीत आहेत.
सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीनेही खरीप पिके पूर्णपणे वाया गेली. त्यामुळे नव्या उमेदीने शेतकऱ्यांनी रब्बी पिके घेतली. मात्र सततच्या ढगाळ वातावरणामुळे या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. वडाळी, जयनगर, कोंढावळ, बामखेडा, तोरखेडासह परिसरातील शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. रब्बी हंगामासाठी, बोअरवेल, विहिरींमध्ये पाणी आहे, पण रब्बीतील गहू आणि हरभऱ्याच्या वाढीसाठी पूरक वातावरणाची निर्मिती होणे आवश्यक आहे. त्यामुळे याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाचा फटका गहू व हरभरा या पिकांना बसण्याची शक्यता आहे. या हवामानामुळे मावा, अळीबरोबरच रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. हतबल होत शेतकरी महागडी कीडनाशके घेऊन ती पिकांवर फवारणी करत आहेत.
- दीपक पाटील, प्रगतिशील शेतकरी, वडाळी, ता. शहादा, जि. नंदुरबार
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.