
नगर : आगामी तीन ते चार दिवस उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे (Cold Weather) जिल्ह्यामध्ये पारा आणखी घसरणार व तीन दिवस थंडी (Clod Weather) राहणार असल्याची माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम विभागाच्या समन्वयक डॉ. रवींद्र आंधळे यांनी दिली.
जानेवारी ते मार्च हा थंडीचा कालावधी असतो. मध्यंतरीच्या काळामध्ये कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले होते, तसेच बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे काही काळ थंडीचा प्रादुर्भाव दिसून आला नव्हता. दोन-तीन दिवसांपासून उत्तरेकडील शीतलहरी आपल्या भागामध्ये अचानक चक्राकार स्वरूपामध्ये वाहत आहेत.
पुढील तीन ते चार दिवस तापमान कमी राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात ४ ते ५ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. कृषी विद्यापीठातील केंद्रीय हवामानशास्त्र विभागाचे मोहन देठे यांनी कृषी विद्यापीठ परिसरातील तापमान नोंदविले आहे.
नगर जिल्ह्यात ९ जानेवारीला २६.६ व १०.९ व १० जानेवारीला कमाल २६ व किमान ९ एवढे तापमान नोंदवले गेले आहे.किमान तापमानात घट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सिंचन संध्याकाळच्या वेळी करा.
रात्री गुरांना गोठ्यात ठेवावे आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी गोठा कोरडा असावा. कोंबड्यांच्या शेडमध्ये कृत्रिम प्रकाश देऊन पिले गरम ठेवा. सकाळी लवकर जनावरे चारायला नेऊ नका, असे आवाहन विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम विभागाचे समन्वयक डॉ. आंधळे यांनी केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.