जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘संवाद’ ठरतोय सार्थकी

१३६ तक्रारी निकाली ः वेळेबरोबर नागरिकांची पायपीट थांबली
collector's office
collector's officeAgrowon

वर्धा ः ग्रामीण भागातील स्थानिक समस्येपासून तर कार्यालयीन समस्या मांडता याव्यात यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात (collector's office) संवाद कक्ष सुरू करण्यात आला. आतापर्यंत १४६ तक्रारी या कक्षात नोंदविण्यात आल्या. यापैकी १३६ तक्रारी निकाली निघाल्या असून, ११ तक्रारी प्रक्रियेमध्ये आहेत.

collector's office
Soybean : यंदाच्या खरिपात सोयाबीन बियाणे उगवणीच्या ६२ तक्रारी

जिल्हाधिकारी कार्यालयातील संवाद कक्षामुळे वेळेबरोबर नागरिकांची पायपीट थांबली आहे. जिल्ह्यातील प्रमुख शहरात विकास गतीने धावत असला तरी ग्रामीण भागात अजूनही समस्या कायम आहे. या संदर्भात तहसील कार्यालय, तसेच संबंधित विभागाला तक्रारी करण्यात येते; मात्र त्या तक्रारीचे निराकरण होत नसल्याने तशाच पडून राहत होत्या. तर काही कामांत गावातील राजकारण तसेच अन्य अडथळे येत नसल्याचे निदर्शनास आल्याने, मध्यस्थी कागदपत्राचा खटाटोप दूर करत थेट जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार नोंदविण्यासाठी संवाद कक्ष सुरू करण्यात आला. येथे नोंदविलेल्या तक्रारींचा थेट जिल्हाधिकारी यांच्याकडून दखल घेतली जात असल्याने, संबंधित अधिकाऱ्यांनी याची नोंद घेत तक्रारी निपटारा होण्यास मदत मिळाली. गत सहा महिन्यांत या संवाद कक्षात १४६ तक्रारी नोंदविण्यात आल्या. त्यापैकी १३६ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिलांना लाभ देण्यासाठी संवाद कक्ष सुरू करण्यात आला होता. त्याची व्यापकता वाढवीत ग्रामीण भागातील सर्वच शासकीय सेवेत येणाऱ्या तक्रारींचा यात समावेश करण्यात आला. तक्रार नोंदविण्यासाठी दोन महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. दिवसाकाठी किमान दहा तक्रारी नोंद होत होत्या. जिल्हाधिकारी यांच्याकडून आलेल्या तक्रारीचा दिवसाला दोन वेळा आढावा घेत समस्या निकाली काढल्या जात होत्या; मात्र त्यानंतर त्यांची बदली झाली. त्यानंतर कोरोना काळात ही सेवा ठप्प पडली होती.

collector's office
Farmer Suicide : विदर्भात सात महिन्यांत ८१० शेतकरी आत्महत्या

येथे करा तक्रार
शिक्षण, भूमिअभीलेख, पाणंद रस्ते, आरोग्य, माहिती अधिकार, आधार, कृषी, पुनर्वसन, महिला व बालकल्यान सह सर्व तक्रारीच्या निवारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात संवाद कक्ष सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिक या कक्षातील १८०० २३३२ ३८३ या क्रमांकाच्या हेल्पलाइनवर दूरध्वनी करून आपली तक्रार सादर करू शकतात.
.............
व्यापकता वाढविण्याची गरज
तत्कालीन जिल्हाधिकारी नवाल यांनी सुरू केलेला हा उपक्रम जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी सार्थकी ठरतो आहे. असे असले तरी गत सहा महिन्यांत केवळ १४६ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. याची व्यापकता वाढविल्यासाठी ग्रामपंचायत, तसेच प्रत्येक शासकीय कार्यालयातील दर्शनी भागात संवाद कक्षाच्या टोल फ्री क्रमांकाचे फलक लावण्याची गरज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com