
Ratnagiri Wild Animal News ः जिल्ह्यातील पाडलोस (ता. सावंतवाडी) येथील शेतीचे गव्यांच्या कळपांकडून नुकसान (Wild Animal Rampage) सुरूच आहे. काढणीयोग्य पिकांचे नुकसान (Crop Damage) गव्यांकडून होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान गुरुवारी (ता. २) गव्यांनी परिपक्व झालेल्या चवळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
जिल्ह्यातील पाडलोस परिसरातील बहुतांश गावांत रब्बी हंगामात नाचणी, कुळीथ, चवळी, उडीद, भुईमूग यासह विविध पिके घेतली जातात. खरिपातील भातपीक कापणी झाल्यानंतर तत्काळ या पिकांची लागवड केली जाते.
दरम्यान यावर्षी नोव्हेंबरमध्ये पिकांची लागवड केली होती. अवकाळी पावसामुळे या वर्षी या पिकांवर किडरोगांचा प्रादुर्भाव जाणवला होता. परंतु शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना करीत पिके वाचवली. या पिकांमधील चवळी पीक तर परिपक्व झाले होते.
परंतु गुरुवारी रात्री गव्यांच्या कळपांने चवळी पिकांचे पूर्णपणे नुकसान केले. काढणीयोग्य आलेल्या पिकाची पूर्णपणे नासधूस केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पाडलोस येथील शेतकरी विश्वनाथ नाईक यांचे चवळी पीकच गव्यांनी उद्ध्वस्त केले. शेतकरी गव्यांना पळवून लावण्यासाठी विविध उपाय करतात. परंतु रात्री-अपरात्री शेतीचे नुकसान गवे करीत आहेत.
दोन-तीन महिने प्रचंड काबाडकष्ट करून उभे केलेले पीक एक रात्रीत नाहीसे झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे.
वन विभागाकडे सातत्याने मागणी करूनदेखील गव्यांबाबत ठोस उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकरी श्री. नाईक यांनी केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.