Crop Damage : वादळी पाऊस, गारपिटीने शेकडो हेक्टरवर नुकसान; मदत कधी मिळणार?

वऱ्हाडात शुक्रवारी (ता. १७) सायंकाळच्या सुमारास अकोला, वाशीम जिल्ह्यांत काही तालुक्यांत वादळी वारा, पाऊस व गारपीट झाल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहेत.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Akola News ः वऱ्हाडात शुक्रवारी (ता. १७) सायंकाळच्या सुमारास अकोला, वाशीम जिल्ह्यांत काही तालुक्यांत वादळी वारा, पाऊस व गारपीट (Hailstorm) झाल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले आहेत.

कृषी विभागाने (Agriculture Department) दिलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यात पातूर, बार्शीटाकळी, तर वाशीम जिल्ह्यात मालेगाव व मंगरूळपीर तालुक्यात गहू, हरभरा, संत्रा, कलिंगड, पपई, आंबा, कांदा, लिंबू, ज्वारी, भुईमूग, मोसंबी अशा विविध पिकांना याचा फटका बसला.

अकोला जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपिटीमुळे पातूर तालुक्यात २८७ शेतकऱ्यांचे ३७४ हेक्टरवर नुकसान झाले आहे. या तालुक्यात प्रामुख्याने कोठारी खुर्द, कोठारी बुद्रुक, आस्टुल, पास्टूल गावांत पावसासह गारपीट झाली.

कोठारी खुर्द गावात ८२ हेक्टर, कोठारी बुद्रुक गावात ८५ हेक्टर, आस्टुलमध्ये १०५, पास्टूलमध्ये १०२ हेक्टरवर नुकसान झाले. बार्शीटाकळी तालुक्यात १५४ हेक्टरवर नुकसानाची नोंद झाली.

जिल्ह्यात पातूर तालुक्यात सर्वाधिक फटका बसला. वाशीम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला. पांगराबंदी व इतर गावांत जोरदार गारपीट झाल्याचे वृत्त आहे.

Crop Damage
Crop Damage: पुन्हा गारांचा सडा; शेतकरी मेटाकुटीला

कृषी खात्याने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार मालेगाव तालुक्यात २५६ हेक्टरवरील गहू, मोहरी, तीळ, ज्वारी, कांदा, कलिंगड, भाजीपाला, लिंबूवर्गीय पिकांचे नुकसान झाले. मंगरूळपीर तालुक्यातही ५७ हेक्टरवरील गहू, कांदा, हरभरा, भाजीपाल्याचे नुकसान झाले. हा प्राथमिक अहवाल असून, प्रत्यक्षात नुकसान वाढण्याची शक्यता आहे.

Crop Damage
Crop Damage : दोन जिल्ह्यांत १६ हजार ३५ हेक्टरवर नुकसान

किन्हीराजा परिसरात पाऊस...

वाशीम जिल्ह्यातील रामराववाडी, पिंपळशेंडा परिसरांत गारांसह पाऊस झाल्याने गहू, हरभरा, लिंबू, आंबा, कांदा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. लिंबाच्या आकाराची गार पडल्याचे वृत्त आहे.

किन्हीराजासह पिंपळशेंडा रामराववाडी, कुत्तरडोह, माळेगाव, अमानवाडी परिसरांत शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. या भागात गारपीट व वादळी पावसाने नुकसान झाल्याने त्वरित सर्वेक्षण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

वीज पडून तूर जळाली...

वाशीम जिल्ह्यात मानोना तालुक्यातील पाळोदी गावात तुरीच्या गंजीवर वीज पडली. यामुळे सुमारे एक लाख २२ हजार रुपयांची तूर जळून खाक झाली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com