
Maharashtra Budget Session 2023 राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपीटीमुळे (Hailstorm) शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Crop Damage) झाले आहे. ऐन काढणीला आलेली पिके अवकाळीमुळे मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३१ मेपर्यंत पीकविमा योजनेंतर्गत (Crop Insurance) नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरूवारी (ता. १६) विधान परिषदेत दिली.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील वेगवेगळ्या भागात गारपीट आणि अवकाळी पावसाचा रब्बी हंगामातील पिकांना आणि फळबांगाना चांगलाचा तडाखा बसला आहे. लेट खरीप कांद्याचे घसरलेले दर तसेच विविध शेतमालाचे पडलेले भाव यामुळे आधिच शेतकरी संकटात सापडला आहे.
अशातच अवकाळीमुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढावले आहे. त्यामुळे आता अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने दिलासा देणारी बातमी दिली आहे.
राज्याचे कृषीमंत्री सत्तार यांनी अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३१ मेपर्यंत पिकविम्याचे पैसे दिले जातील, अशी माहिती दिली आहे.
विधानपरिषदेत बोलताना सत्तार म्हणाले की, कोणत्याही नुकसान झालेल्या शेतकऱ्यानी माहिती दिल्यानंतर त्याची भरपाई पाचही विमा कंपन्यांच्या माध्यमातून दिली जाईल.
या नुकसान भरपाईचे वेगवेगळे टप्पे असणार आहेत. सरकारच्या नियम आणि धोरणांनुसार शेतकऱ्यांना निश्चितपणे नुकसान भरपाई देण्यात येईल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.