
नांदेड : जिल्ह्यात खरीप हंगामाानंतर शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी (Rabbi Season) ५६३ कोटी ८१ लाखांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना आजपर्यंत जिल्ह्यात राष्ट्रीय तसेच ग्रामीण बँकांकडून २७ हजार ७६ शेतकऱ्यांना २१६ कोटी ६६ लाख रुपयांचे पीक कर्जवाटप (Crop Loan) केले आहे. यात ग्रामीण बँक तसेच व्यापारी बँकांकडून प्रत्येकी ३८ टक्के कर्जवाटप केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात एक हजार ५८१ कोटी ५९ लाख तर रब्बी हंगामात ५६३ कोटी ८१ लाख असे एकूण दोन हजार १४५ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट प्रशासनाने २८ बँकांच्या वेगवेगळ्या शाखांना दिले आहे.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शेतकऱ्यांना वेळेत कर्ज देण्याची सूचना दिली होती. दरम्यान खरीप हंगामात ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ९४ टक्क्यांनुसार एक लख ९४ हजार ७९२ शेतकऱ्यांना एक हजार ४९२ कोटी ५० लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. यानंतर आक्टोबरपासून रब्बीसाठी पीककर्ज वाटप करण्याचे काम सुरू झाले. यात रब्बी हंगामासाठी ५६३ कोटी ८१ लाखांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. परंतु २६ डिसेंबरपर्यंत २७ हजार ७६ शेतकऱ्यांना २१६ कोटी ६६ लाख रुपयांचे पीक कर्जवाटप केले आहे. यात ग्रामीण बँकेकडून चार हजार २१९ शेतकऱ्यांना ३२ कोटी ५३ लाखांनुसार ३८.८६ टक्के कर्जवाटप केले आहे. तर राष्ट्रीय बँकेकडून २२ हजार ८५७ शेतकऱ्यांना १८४ कोटी १३ लाखांचे कर्जवाटप केले आहे. याचे एकूण प्रमाण ३८.८६ टक्के असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.