
पंढरपूर, जि. सोलापूर ः ‘‘रब्बी हंगामासाठी हरभरा (Rabi Chana) हे कडधान्य पीक शेतकऱ्यांसाठी आर्थिक तसेच शेतीचा पोत सुधारण्यासाठी खूप फायदेशीर आहे.
कमी खर्च आणि अधिकच्या उत्पन्नासाठी हरभरा पिकाचा (Chana Cultivation) विचार शेतकऱ्यांनी करावा. त्याचे आहारातील महत्त्वही मोठे आहे,’’ असे प्रतिपादन टाकळी येथील तेलबिया पिके संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. रमेश भदाणे (Dr. Ramesh Bhadane) यांनी केले.
टाकळी येथील तेलबिया पिके संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने नुकताच ‘हरभरा दिवस’ साजरा करण्यात आला.
या प्रसंगी पंढरपूर परिसरातील शेतकऱ्यांसह मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. तानाजी वळकुंडे, उपविभागीय कृषी अधिकारी सर्जेराव तळेकर, तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे या वेळी उपस्थित होते.
भदाणे म्हणाले, ‘‘पंढरपूर भागात ऊसशेती अधिक होते, उसामध्ये आंतरपीक म्हणून हरभरा पिकाचा पर्याय होऊ शकतो.’’
शिवारफेरीतून प्रत्यक्ष अनुभव
तृणधान्य वर्षाचे औचित्य साधत शेतकऱ्यांसाठी संशोधन केंद्रावर हरभरा दिवस व शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले.
या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना हरभरा पिकाची लागवड, पूर्वमशागत, सुधारित वाण, कीड व रोग व्यवस्थापन, काढणी व काढणीपश्चात तंत्रज्ञान, उपपदार्थ बनविणे, विक्री व्यवस्थापन व पिकाचा नफा तोटा इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.