Crop Damage
Crop DamageAgrowon

Crop Damage : रत्नागिरीत ५० हेक्टरवरील भातपिकाचे नुकसान

लांबलेल्या परतीच्या पावसाचा फटका; पंचनामे सुरू

रत्नागिरी ः मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भात कापणीत (Paddy Harvesting) अडथळा निर्माण झाला होता. मुसळधार पावसामुळे भात पीक (Paddy Crop) आडवे झाल्यामुळे सुमारे ५० हेक्टरचे नुकसान झाले आहे. या व्यतिरिक्त विमा उतरवलेल्या ८३४ जणांनी परताव्यासाठी संबंधित कंपनीला सूचना दिल्या आहेत.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच २३ ऑक्टोबरला पाऊस महाराष्ट्रातून परतला. त्यानंतर दिवाळीच्या दिवसापासून थंडीला सुरुवात झाली. दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून थांबतो; मात्र यंदा परतीचा प्रवास लांबला. त्याचा फटका भात शेतीला बसला. जिल्ह्यात ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. त्यातील कमी दिवसांच्या म्हणजेच हळव्या भात बियाण्यांच्या कापणीला लांबलेल्या पावसाचा फटका बसला. या वर्षी दसऱ्यानंतर भात कापणीसाठी तयार झाला होता. याच कालावधीत पावसाचा जोरही वाढला होता. दिवसा कडक ऊन आणि सायंकाळनंतर मुसळधार पाऊस असे चित्र होते. त्यामुळे अनेकांनी कापणी न करणेच पसंत केले. चिपळूण, संगमेश्‍वर, राजापूर, लांजा आणि रत्नागिरी तालुक्यांत अनेक ठिकाणी पावसामध्ये उभा भात आडवा झाला. पाऊस थांबून थांबून पडत असल्याने शेतकऱ्यांनी आडवा झालेला भात कापून सुकवण्यासाठी कातळावर टाकून ठेवला. तोही पावसात भिजला. १४ ते १६ ऑक्टोबर दरम्यान सलग पाऊस पडत होता. या कालावधीत जिल्ह्यात भात शेतीचे सुमारे ५० हेक्टर एवढे नुकसान झाले. सर्वाधिक नुकसान चिपळूण तालुक्यात नोंदले गेले.

जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाने प्राथमिक अंदाज वर्तविला असून, पंचनामे सुरू आहेत. हे काम आठवडाभरात पूर्ण होईल. राजापूर तालुक्यातील दोन, लांजा तालुक्यातील एक अशा तीन महसुली मंडलांत ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याची नोंद आहे. परिसरातील भात पिकांचे नुकसान झाले. पावसामध्ये भात भिजत राहिल्यामुळे तांदूळ काळा पडण्याची भीती आहे.

पन्नास टक्के कापण्या पूर्ण
दिवाळीला पाऊस थांबल्यानंतर भात कापणीला वेग आला. सणाच्या कालावधीत पावसाच्या भीतीने शेतकरी शेतात काम करत होता. आतापर्यंत पन्नास टक्क्यांहून अधिक कापण्या पूर्ण झाल्याचा अंदाज कृषी विभागाकडू वर्तविण्यात आला आहे. जिल्ह्यातील भाताचे एकूण क्षेत्र ६८ हजार हेक्टर असून, त्यातील सुमारे ३४ हजार हेक्टरवरील कापण्या पूर्ण झाल्या आहेत.
परतीचा पाऊस थांबून थांबून पडत असल्यामुळे जिल्ह्यातील भातशेतीला मोठा फटका बसला नाही. जिथे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे, त्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Crop Damage
Crop Damage : दोन लाखांवर हेक्टरवरील पिकांचे नुकसान

पाऊस साधारणपणे संध्याकाळपासून रात्रभर पडत होता. दुपारी विश्रांती घेत असला तरीही कापलेले भात सुकवण्यासाठी पुरेसा कालावधी मिळत नव्हता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापणी टाळली होती. त्यामुळे काही अंशी भाताचे नुकसान झाले.
- संतोष भडवळकर, राजवाडी, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com