Paddy Crop Damage : लांजा तालुक्यात भातशेतीचे नुकसान

गेले चार दिवस जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. रविवारी (ता. १६) सायंकाळी पडलेल्या पावसामुळे भातशेतीला फटका बसला आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

रत्नागिरी ः गेले चार दिवस जिल्ह्यात परतीच्या पावसाने (Heavy Rainfall) धुमाकूळ घातला होता. रविवारी (ता. १६) सायंकाळी पडलेल्या पावसामुळे भातशेतीला (Paddy Farming) फटका बसला आहे. लांजा तालुक्यातील पालु येथे काजळी नदीचे (Kajli River) पाणी वाढल्यामुळे भातशेतीचे नुकसान झाले.

Crop Damage
Crop Damage : ऐन दिवाळीत पिकांची राख रांगोळी

गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने लांजा तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. तयार झालेली भात पिके शेतातच उभी आहेत. पावसामुळे भात पीक कापायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

परतीच्या पावसाने लांजा तालुक्यातील पूर्व भागाला जोरदार दणका दिला. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास कोसळलेल्या जोरदार पावसामुळे येथील काजळी नदीला आलेल्या पुराचे पाणी थेट येथील शेतकऱ्यांच्या शेतात घुसले.

त्यामुळे तयार झालेले भात पीक हे पूर्णपणे पुराच्या पाण्याने आडवे झाले असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा पाऊस सायंकाळी सहा वाजेपर्यंत जोरदार कोसळत होता. भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागाकडून सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com