Vegetable : पावसामुळे भाजीपाला उत्पादकांची तारांबळ

सततच्या पावसामुळे भाजीपाला काढणीयोग्य होऊनही काढता येत नसल्याची स्थिती आहे; मात्र नुकसान टाळण्यासाठी तो वेळेवर काढण्याशिवाय पर्याय नाही.
Vegetable
VegetableAgrowon

नाशिक : जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाचा (Heavy Rain) जोर कायम आहे. त्यामुळे सर्वत्र दाणादाण उडाल्याचे चित्र आहे. सततच्या पावसामुळे भाजीपाला (Vegetable) काढणीयोग्य होऊनही काढता येत नसल्याची स्थिती आहे; मात्र नुकसान टाळण्यासाठी तो वेळेवर काढण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे भर पावसातही शेतमजूर लावून तो काढण्यासह तो सुरक्षितस्थळी वाहून नेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे; मात्र या कामांसाठी आता अधिकची मजुरी द्यावी लागत आहे.

जिल्ह्यातील सिन्नर, इगतपुरी, सटाणा, कळवण या तालुक्यांतील भाजीपाला उत्पादक पट्ट्यात टोमॅटो, मिरची, कोबी, वांगी, कोथिंबीर ही पिके पाण्याखाली गेली आहेत.

त्यामुळे नुकसान होत असल्याने केलेला खर्च वसूल होण्यासाठी भर पावसात शेतीमाल काढून तो बाजारात नेण्याची कसरत करावी लागत असल्याचे पाहायला मिळत आहे; मात्र संततधार सुरू असल्याने सध्या शेतात पाणी साचल्याने कामकाजात व्यत्यय येत आहे.

Vegetable
Vegetable Processing : फळे, भाजीपाला प्रक्रियेतून प्रगतीकडे वाटचाल

एकीकडे बाजारात भाजीपाल्याची आवक कमी असून दरात सुधारणा झाली आहे. त्यामुळेच केलेला खर्च वाया जायला नको अन् दोन पैसे मिळतील या आशेने शेतकरी प्राधान्याने अडचणीत भाजीपाला काढणी करत आहेत. त्यासाठी शेतमजुरांची मदत घेत पावसात शेतीमाल काढून तो बाजारात नेल्याचे बघायला मिळाले.

सटाणा तालुक्यात भर पावसात कोथिंबीर काढणीचे कामकाज सुरू आहे. तर सिन्नर व इगतपुरी तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर मधुमक्याच्या लागवडी आहेत. सध्या मधुमक्याला मागणी आहेच. शिवाय मका काढणीयोग्य झाल्यावर वेळीच काढणे गरजेचे असते; मात्र संततधारेमुळे शिवारात पाणी तुंबले आहे. त्यामुळे कामात व्यत्यय येत आहे. अशा परिस्थिती बेलू शिवारातील मक्याच्या शेतात मका कणसे खुडून भरलेल्या गोण्या पाणी तुंबलेल्या शेतातून वाहून आणाव्या लागत आहेत.

पावसामुळे मजुरी दरात दुपटीने वाढ :

भर पावसात भाजीपाला काढावा लागत असल्याने सध्या सटाणा तालुक्यात मजुरी दर दुप्पट झाला आहे. पूर्वी ३०० ते ३५० रुपये प्रचलित दर आहे; मात्र सध्या पावसाच्या पार्श्‍वभूमीवर कामांसाठी ७०० रुपये मोजावे लागत असल्याचे अंतापूर (ता. सटाणा) येथील कोथिंबीर व्यापारी रोहिदास जाधव यांनी सांगितले.

मका हंगाम हा पावसात येत असतो. सध्या मागणी आल्याने खुडणी करावीच लागत आहेत. मक्याची वेळेवर खुडे न झाल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे.
नितीन आरोटे, मधुमका उत्पादक व व्यापारी, आगासखिंड, ता. सिन्नर
कसमादे भागातील भाजीपाला प्रामुख्याने गुजरात, राजस्तान, मध्य प्रदेश व दिल्ली येथे जातो; मात्र पावसामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक कमी असल्याने दरात सुधारणा आहे. पण नुकसान होऊ नये यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागत आहेत. वाहतुकीदरम्यान भाजीपाल्याच्या प्रतवारीवर परिणाम असून काही प्रमाणावर नुकसान होत असल्याची स्थिती आहे.
रोहिदास नानाजी जाधव, भाजीपाला उत्पादक व व्यापारी, अंतापूर, ता. सटाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com