
अमरावती : अतिवृष्टीने नुकसान (Heavy Rain Crop Damage) सहन करीत असलेल्या शेतकऱ्यांना अद्याप शासनाची आर्थिक मदत (Crop Damage Compensation) मिळालेली नाही. त्यामुळे बँकेच्या पीक कर्जाच्या (Crop Loan) ओझ्याखाली दबण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. खरीप हंगामातील शेतकऱ्यांसमोर आता परतफेडीचा (Loan Repayment) प्रश्न उभा झाला आहे.
यंदाच्या खरिपात ९४ टक्के पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. यंदाचा खरीप हंगाम चांगला राहण्याचे अंदाज सुरुवातीस हवामान विभागाने दिले होते. गत हंगामात सोयाबीन, कापसाला मिळालेले चढे दर बघता यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या जोमाने दोन्ही पिकांची पेरणी केली. त्यासाठी बँकांकडून पीककर्ज घेतले.
तत्कालीन ठाकरे सरकारने कर्जमाफी दिल्याने व पिकांना मिळालेल्या चढ्या दरांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली दिसल्याने बँकांनी कर्जवाटप केले. यंदाचा हंगाम मात्र बुडाल्यात जमा आहे.
सोयाबीनचे साठ टक्के पीक हातातून जाण्याची स्थिती आहे. खुल्या बाजारात सोयाबीनचे दर कोसळले आहेत. हमीदराच्या तुलनेतही समांतर भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा घेतलेल्या पीककर्जाची परतफेड कशी करावी, या विवंचनेत शेतकरी आला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात १ लाख २३ हजार शेतकऱ्यांनी १३११ कोटी रुपयांचे पीककर्ज घेतले आहे. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ६२ हजार ९१७ शेतकऱ्यांना ७३५ कोटी ९१, खासगी क्षेत्रातील बँकांनी २२०६ शेतकऱ्यांना ३८ कोटी १६ लाख, तर ग्रामीण बँकांनी २१६१ शेतकऱ्यांना २१ कोटी ५२ लाख रुपयांचे पीककर्ज दिले. जिल्हा बँकेने ५५ हजार ७१८ शेतकऱ्यांना ५१५ कोटी ४९ लाख रुपये कर्जवाटप केले आहे.
चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा धुळीस
यंदा हंगाम चांगला राहील, उत्पादनाची सरासरी व गतवर्षीप्रमाणे चढे दर मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र ती अतिवृष्टी व सततच्या पावसाने धुळीस मिळवली. त्यामुळे कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न उभा झाला असतानाच अतिवृष्टीची मदतही मिळत नसल्याने विवंचना वाढली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.