Rabi Irrigation : कुकडी प्रकल्पातून रब्बीचे आवर्तन सुरू करण्याची मागणी

रब्बी हंगामातील मशागतीची, पेरणीची व कांदा लागवडीची कामे सुरू असून, उन्हाची तीव्रता वाढल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
Rabi Season
Rabi SeasonAgrowon

नारायणगाव, ता. जुन्नर ः रब्बी हंगामातील (Rabi Season) मशागतीची, पेरणीची (Sowing) व कांदा (Onion Production) लागवडीची कामे सुरू असून, उन्हाची तीव्रता वाढल्याने पाणीटंचाई (Water Shortage) निर्माण झाली आहे. यामुळे कुकडी प्रकल्पांतर्गत धरणातून रब्बीचे (Rabi) आवर्तन सुरू करावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गणपतराव फुलवडे यांनी केली आहे.

Rabi Season
Rabi Crop Insurance : गेल्या रब्बीसाठीचा १८ कोटी ७८ लाखांचा पीकविमा मंजूर

कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात या वर्षी मुसळधार पाऊस झाल्याने कुकडी प्रकल्पांतर्गत येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे, डिंभे या पाच धरणांत शुक्रवार (ता. २) अखेर २८.१० टीएमसी (९४.६९ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी प्रकल्पात २ डिसेंबरपर्यंत २३.८३ टीएमसी (८०.३२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी प्रकल्पात ४.३७ टीएमसी(१४.३७ टक्के) जास्त उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून, रब्बी हंगामातील गव्हू पेरणीची व कांदा लागवडीची कामे सुरू असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. प्रामुख्याने डिंभे डावा कालव्या लगत असलेली जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील शेतजमीन हलक्या प्रतीची व मुरमाड असल्याने पिकांना पाण्याची गरज आहे. यामुळे किमान डिंभे डावा कालव्यात रब्बीचे आवर्तन सुरू करावे, अशी मागणी आहे. या वर्षी प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. यामुळे रब्बी पिकांना पाणीटंचाई निर्माण होणार नाही.

Rabi Season
Maisal Water Scheme : जत-म्हैसाळ विस्तारित योजना अहवाल पाठवण्याची सूचना

धरणनिहाय शक्रवारी (ता. २) अखेरचा उपयुक्त पाणीसाठा टीएमसी (कंसात टक्के) :

येडगाव: १.९२२ टीएमसी (९८.९२ टक्के), माणिकडोह : ९.२०६ टीएमसी (९०.४४ टक्के), वडज : १.१५४ टीएमसी (९८.४० टक्के), पिंपळगाव जोगे: ३.३६४ टीएमसी (८६.४७ टक्के), डिंभे : १२.४५३ टीएमसी (९९.६६ टक्के)

१५ ऑक्टोबरपासून फेब्रुवारीअखेर रब्बी हंगाम असतो. कालवा सल्लागार समितीची बैठक अद्याप न झाल्याने रब्बी हंगामाचे नियोजन अद्याप झाले नाही. यामुळे कालव्यात आवर्तन सुरू करता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष आहे. शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून पालकमंत्री पाटील यांनी तातडीने किमान डिंभे डावा कालव्यात पाणी सोडण्याचे आदेश द्यावेत.

- गणपतराव फुलवडे, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com