
मालेगाव, जि. वाशीमः तालुक्यात अतिवृष्टीने (Heavy Rain) शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान (Crop Damage) झाले आहे. शेतकऱ्यांची दिवाळीसुद्धा अंधारात गेली होती. नुकतेच हिवाळी अधिवेशन झाले. तरीसुद्धा शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पीक विम्याची मदत (Crop Insurance Compensation) अजूनपर्यंत खात्यामध्ये जमा झाली नाही.
तेव्हा तत्काळ ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आला. याबाबत पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार रवी काळे यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले, की शेतकरी अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेला असताना पिकलेल्या सोयाबीनला भाव मिळत नाही. स्वतः जवळून खर्च करून पीकविमा काढला. परंतु पीकविमा कंपन्याला सरकार पाठीशी घालून शेतकऱ्यांची फसवणूक व पिळवणूक करण्याचे काम करीत आहे.
तेव्हा शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पैसा तत्काळ त्यांच्या खात्यामध्ये जमा करावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद प्रशासनाने घ्यावी. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी मालेगाव तालुकाप्रमुख उद्धव पाटील गोडे, भगवान बोरकर, अनिल शिंदे, सोनू सांगळे, विजय शेंडगे, माधवराव जाधव, भारत घुगे, एकनाथ जाधव व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.