
Crop Damage Compensation News परतूर, जि. जालना : पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान (Crop Damage) झाले आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत (Compensation) जाहीर केली; मात्र ती अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही.
सदर मदत तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या परतूर शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत संघटनेने नुकतेच परतूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. शासनाने अतिवृष्टी झाल्यानंतर तातडीने मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार असल्याची घोषणा केली होती.
शासनाच्या घोषणेला सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही.
दसरा, दिवाळी हे मोठे सण शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीला तोंड देत साजरे करावे लागले. मदत जमा करण्यास शासन जाणीपूर्वक चालढकल करत असल्याचा आरोप करत आठ दिवसांत मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही तर, १३ फेब्रुवारीला उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला.
निवेदनावर तालुकाध्यक्ष गणेश राजबिंडे, शिवाजी महाराज भोसले, रमेश गायकवाड, तात्याराव मोरे, वामन सोळंके, वैजनाथ दराडे आदींच्या सह्या आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.