अतिवृष्टीमुळे भाजीपाला लागवडी रोगांच्या विळख्यात

नाशिक, इगतपुरी, पेठ, सिन्नर, दिंडोरी, निफाड, चांदवड, सटाणा, कळवण, देवळा तालुक्यांत भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणावर आहेत. जुलै महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला.
Vegetable
Vegetable Agrowon

नाशिक : जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) भाजीपाला लागवडी (Vegetable Cultivation In Crisis) मोठ्या प्रमाणावर धोक्यात आल्या आहेत. पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव (Pest, Disease Outbreak On Vegetable Crop) वाढता असल्याचे शेतकऱ्यांचे हंगामी नियोजन पुरते कोलमडले आहे. सूर्यप्रकाशाचा अभाव व सततच्या पावसामुळे पीकसंरक्षण (Crop Protection) खर्च वाया जात आहे. रोगांचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत नसल्याने लागवडी उपटून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

नाशिक, इगतपुरी, पेठ, सिन्नर, दिंडोरी, निफाड, चांदवड, सटाणा, कळवण, देवळा तालुक्यांत भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणावर आहेत. जुलै महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. त्यानंतर ऑगस्टचा सुरुवातीला अनेक भागांना पावसाने झोडपले. त्यानंतर ढगाळ वातावरण असल्याने पिकांना वाढीच्या अवस्थेत सूर्यप्रकाश मिळालेला नाही. त्यामुळे करपाजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहेत.

Vegetable
Vegetable : थेट ग्राहकांना‘भाजीपाला बास्केट'ची विक्री

सततच्या पावसामुळे जाड व काळ्या जमिनीत पाण्याचा निचरा होत नसल्याने मुळांची कार्यक्षमता तर सूर्यप्रकाश नसल्याने पानांची अन्ननिर्मिती प्रक्रिया मंदावली आहे. तर पावसामुळे पिकांवर फवारण्या करता आलेल्या नाहीत. भाजीपाला पिकांच्या शरीरशास्त्रावर परिणाम झाल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजार आवारात होणारी आवक सर्वसाधारण होत आहे.

Vegetable
Vegetable : नाशिकमध्ये वालपापडी-घेवड्याची आवक वाढून दरात घसरण

टोमॅटो पिकात करपा, पाने पिवळे पडणे, फळांवर ठिपके, जिवाणू करपा, मूळकुज ही समस्या आहे. फळ काढणी सुरू असलेल्या लागवडीत फुल कळी गळणे व फळांचा आकार न होणे, फळांना तडे जाणे ही प्रमुख समस्या आहे. वेलवर्गीय पिकांमध्ये कारले, भोपळा, गिलके, काकडी, दोडका या पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामध्ये पानगळ, करपा व झाडांची मर होत आहे. सिमला मिरची लागवडीमध्ये शेंडा व काडी करपा आल्याने झाडे रोगग्रस्त झाली असून मर रोग वाढीस लागला आहे.

सटाणा भागातह मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. पपई लागवडीतदेखील नुकसान आहे. जास्त पावसामुळे फळधारणा होत नाही शिवाय मर होत असल्याचे शेतकऱ्यांनी कळविले. सिन्नर तालुक्यात कोबी, टॉमॅटो, सिमला मिरची, मिरची, फ्लॉवर, कांदे रोपे, आले, पालेभाज्या अशा अनेक पिकांचे नुकसान झाले आहे.

भाजीपाला पिकांना वाढीच्या अवस्थेत सूर्यप्रकाश महत्त्वाचा आहे. मात्र प्रतिकूल वातावरणामुळे टॉमॅटो पिकांत तडे जाण्याची समस्या वाढली आहे. कॅल्शिअम बोरॉन फवारण्या महत्त्वाच्या आहे. बुरशी व करपाजन्य रोग टाळण्यासाठी शिफारशीनुसार प्रतिबंधात्मक फवारण्या घेणे गरजेचे आहे. कॉपरयुक्त बुरशीनाशक व प्रति जैविकांचा वापर करावा.

-प्रा. तुषार उगले, सहायक प्राध्यापक, के. के. कृषी महाविद्यालय, नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com