
नाशिक ः पौष्टिक तृणधान्याचे (Milluts) आहारातील महत्त्व लक्षात घेऊन २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे होत आहे.
त्या अनुषंगाने सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये पीक उत्पादन वाढ आणि आहारातील वापर वाढविण्यासाठी कृषी विभागाकडून (Agricultural Department) उन्हाळी बाजरी (Pearl Millet Seed) बियाण्याचे डुबेरे व आटकवडे या गावांमध्ये वितरण करण्यात आले.
तृणधान्ये कमी पाण्यावर येणारी, कमीत कमी कार्बन उत्सर्जन करणारी असल्यामुळे ती पर्यावरणपूरक आहेत. बहुतेक तृणधान्ये कमी कालावधीत काढणीस येतात.
कमीत कमी उत्पादन खर्चात चांगले उत्पन्न देतात आणि हवामान बदलास अनुकूल, तग धरणारी असतात. प्रतिकूल हवामानात तग धरून राहण्याची क्षमता अन्य पिकांच्या तुलनेत चांगली आहे.
आपत्कालीन परिस्थितीसाठी चांगले आहे. पाऊस उशिरा, कमी व अनियमित झाला तरी अन्य तृणधान्यांपेक्षा धान्य व चारा यांचे उत्पादन अधिक मिळते.
सोयाबीन, गहू व बटाटा या पिकांत सूत्रकृमी नियंत्रणासाठी फेरपालट म्हणून बाजरी महत्त्वाची आहे आणि म्हणूनच डुबेरे व आटकवडे गावांमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत उन्हाळी बाजरीचे पीक प्रात्यक्षिक १० हेक्टर प्रति गाव याप्रमाणे घेण्यासाठी ‘धनशक्ती’ वाण बियाण्याचे वितरण करण्यात आले.
या वेळी कृषी सहायक श्रीमती ए. बी. चौधरी यांनी शेतकऱ्यांना आहारात बाजरीचे महत्त्व सांगून माती परीक्षण करण्यासाठी माती नमूना घेण्याबाबत आणि बाजरी बियाण्यास पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करण्याबाबत माहिती दिली.
डुबेरेचे सरपंच ज्ञानेश्वर ढोली, पंडित माळी, कारभारी वारुंगसे, किसन वाजे, दत्तात्रय सांगडे आणि आटकवडेचे उपसरपंच नितीन वाघ, अर्जुन वाघ, दिलीप वाघ आदी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.