
बारामती : ‘‘आपत्तीच्या काळात (Disaster) प्रशिक्षित युवकांची आवश्यकता असते. त्यामुळे युवकांनी आपत्ती व्यवस्थापनाचे (Disaster Management) प्रशिक्षण घेऊन या काळात मोलाचे योगदान द्यावे,’’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांनी केले.
मुंबई येथील मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथील क्रीडा संकुल येथे आयोजित केलेल्या ‘आपदा मित्र’ प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नुकतीच भेट दिली.
त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, तहसीलदार विजय पाटील, परीविक्षाधीन तहसीलदार नेहा शिंदे आदी उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘बारामती आणि इंदापूर तालुक्यातील युवक या प्रशिक्षणात उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याने समाधान वाटत आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन परिस्थिती गंभीर होते.
अशा वेळी मदत कार्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असते. या प्रशिक्षणामुळे आपत्तीच्या प्रसंगी आपतग्रस्तांना तातडीने मदत देणे, विविध आपत्ती संदर्भात प्रतिबंध, निवारण, पूर्वतयारी, प्रतिसाद, मदत व पुनर्वसन इत्यादी बाबी सुव्यवस्थितपणे हाताळण्यासाठी युवक-युवती तयार होतील,’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रशिक्षणामध्ये बारामती आणि इंदापूर तालुक्यातील युवकांसह आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील, कोतवाल व स्वयंसेवक यांचा समावेश आहे. येत्या १४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.