
सांगली ः जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यातच वाढती आर्द्रता (Increased Humidity) यामुळे द्राक्षावर भुरी आणि पसऱ्या डाऊनीचा प्रादुर्भाव (Downy Mildew Outbreak On Grape) काही प्रमाणात होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात द्राक्षाचे दीड लाख एकरांवर क्षेत्र आहे. यंदाच्या हंगामाची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या पंधरा दिवसांत बागेला पोषक असे वातावरण असल्याने द्राक्ष बागेच्या काड्या चांगल्या तयार झाल्या आहेत. फुटवाही चांगला आहे. आगाप फळ छाटणी मिरज, कवठेमहांकाळ, कडेगाव तालुक्यात प्रामुख्याने घेतली जाते. फळ छाटणीची तयार शेतकरी करू लागला आहे. स्थानिक मजूरांसह परराज्यातील मजूर येत्या पंधरा ते वीस दिवसांत जिल्ह्यात दाखल होतील. त्यानंतर फळ छाटणीस प्रारंभ होईल. पोषक वातावरण असल्याने यंदा बागेतून अपेक्षित उत्पन्न मिळेल, अशी आशा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाची रिमझिम तर कधी हलका, तर कधी मोठा पाऊस पडत आहे. त्यातूनही सातत्याने हवामानात बदल होत असल्याचे दिसते आहे. परिणामी आर्द्रताही वाढली आहे. त्यामुळे बदलते वातावरण द्राक्ष बागेला धोकादायक बनले आहे. यामुळे द्राक्ष पट्ट्यात काही ठिकाणी पसऱ्या डाऊनीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तर काही ठिकाणी भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसतो आहे. सध्या काड्या सशक्त असल्याने डाऊनी आणि भुरीचा प्रादुर्भाव झाला तर त्या अशक्त होण्याची भीती निर्माण होत आहे. परिणामी काड्या अशक्त झाल्या तर त्यामध्ये अपेक्षित अशी गर्भधारणा होणार नसल्याची भीती शेतकऱ्यांच्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.