Crop Damage: सततच्या पावसामुळे जमीन चिभडली, पिकांची वाढ खुंटली

वाफसा नसल्यामुळे आंतरमशागतीची कामे ठप्प झालीत. तण नियंत्रण (Weed Control) शक्य नाही. वाढ खुंटली आहे. पानगळ होत आहे. मर लागली आहे. सर्वच पिकांच्या उत्पादनात (Crop Production) मोठी घट येणार आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

परभणीः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सततच्या पावसामुळे (Continuous Rains) जमिनीतील पाण्याचा निचरा होत नाही.परिणामी लाखो हेक्टर जमीन चिभडली आहे. वाफसा नसल्यामुळे आंतरमशागतीची कामे ठप्प झालीत. तण नियंत्रण (Weed Control) शक्य नाही. वाढ खुंटली आहे. पानगळ होत आहे. मर लागली आहे.

सर्वच पिकांच्या उत्पादनात (Crop Production) मोठी घट येणार आहे. पाऊस उघडीप देत नसल्यामुळे नुकसानीची व्याप्ती वाढत आहे. सोयाबीन (Soybean) , कपाशी (Cotton), तूर या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

जून महिन्यात परभणी, हिंगोली जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. परंतु जुलै महिन्यात पावसाने कहर केला. दोन्ही जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. ओढे, नाले, नद्या काठच्या जमिनीवरील पिकात पाणी साचले आहे. मर लागल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत.

या दोन जिल्ह्यात यंदा सुमारे साडेआठ लाख हेक्टरवर पेरणी (Kharif Sowing) झाली आहे. सोयाबीनचे पेरणी क्षेत्र ५० टक्क्याहून अधिक आहे. त्यानंतर कपाशी,तूर आदी पिकांचा समावेश आहे. सततच्या पावसाचा सखल भागातील तसेच चोपण जमिनीवरील पिकांना मोठा फटका बसला आहे. अतिरिक्त पाण्याचा निचरा नाही. पुरेसा सूर्यप्रकाश नाही. अन्नद्रव्ये उपलब्ध होत नाही. पाने पिवळी पडून गळत आहेत.

Crop Damage
NITI Aayog Meet: पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडून हमीभावाच्या कायद्याचा आग्रह

अनेक भागातील वाढीच्या अवस्थेतील मूग, तूर, कपाशी पिकांमध्ये मर लागली. हळद (Turmeric) , ज्वारी, बाजरी, उडीद आदींसह भाजीपाला (Vegetables) , फळपिकांचेही नुकसान झाले. पुरांमुळे जमिनी खरडून गेल्याने सुपीक माती तसेच पिके वाहून गेली आहेत. ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आमच्या गावच्या शिवारातील अर्ध्याहून अधिक जमिनी चिभडल्या आहेत. माझ्या दहा एकर सोयाबीन पानगळ झाल्यामुळे नुसत्या काड्या शिल्लक आहे. तूर मर लागील हळद करपत आहे. नुकसानभरपाई मिळावी.

- काशिनाथ सांगळे, केळी, ता. औंढा नागनाथ

सारखा पाऊस सुरू आहे. जमिनी पाझरत आहेत. खुरपणी, फवारणीची काम करता येईनात कापूस, सोयाबीन पिवळी पडली आहे.

- ज्ञानेश्वर सिद्धनाथ, कोथाळा, ता. मानवत, जि. परभणी.

अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी शेतकरी उपाययोजना करत आहेत. रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी केलेली पिके तुलनेने चांगली आहेत.

- गोविंद कल्याणपाड,तालुका कृषी अधिकारी, वसमत, जि. हिंगोली.

सूर्यप्रकाश नसल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया होत नाही. अन्न द्रव्याअभावी पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. फांद्यांची संख्या कमी आहे. पानगळ होत आहे. उत्पादनात घट मोठी येणार आहे.

- डॉ. गजानन गडदे,विस्तार कृषिविद्यावेत्ता, वनामकृवि, परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com