Rain Update : उघडिपीमुळे शेतीमाल शिवाराबाहेर काढण्याची लगबग

चालू सप्ताहात गुरुवारपर्यंत (ता. १३) पावसाने अनेक भागांना दणका दिला. त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मका, बाजरीसह भाजीपाला या पिकांचे मोठे नुकसान झाले.
Crop Harvesting
Crop HarvestingAgrowon

नाशिक : चालू सप्ताहात गुरुवारपर्यंत (ता. १३) पावसाने अनेक भागांना दणका दिला. त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मका, बाजरीसह भाजीपाला या पिकांचे मोठे (Soybean Crop Damage) नुकसान झाले. आता शुक्रवार (ता. १४) नंतर पावसाने अनेक भागांत खंड दिल्यानंतर शनिवारी (ता. १५) निरभ्र वातावरण होऊन कडक ऊन पडले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवारात वाचलेली पिके शेताबाहेर काढण्याची (Crop Harvesting) लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा कामात व्यग्र झाले आहेत; मात्र नुकसान अधिक असल्याने शेतकरी हवालदिल आहेत.

Crop Harvesting
Crop Damage : होत्याचे नव्हते झाले’

शनिवारी (ता. १५) सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सोनांबे परिसरात हलका पाऊस झाला; मात्र इतर भागांत पाऊस थांबला आहे. यापूर्वी गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात अनेक भागांत पावसामुळे पिके आडवीतिडवी होऊन मोठे नुकसान झाल्याची गंभीर स्थिती आहे. सटाणा, येवला, चांदवड, दिंडोरी, देवळा, नांदगाव, मालेगाव, इगतपुरी तालुक्यांत अतिवृष्टीसदृश पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने पिके अजूनही पाण्याखाली आहेत; मात्र संभाव्य नुकसान टाळण्यासाठी पाण्यात जाऊन आता खरीप पिकांची सोंगणी करावी लागत आहे.

Crop Harvesting
Rain Update : सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

जिल्ह्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पावसाने दणका दिला आहे. परिणामी मका, सोयाबीन, बाजरी ही पिके पावसात भिजल्याने नुकसान वाढले आहे. शनिवारी कडक ऊन पडल्याने शिवारे पुन्हा गजबजू लागली आहेत. तोंडावर असलेल्या रब्बी उन्हाळ कांदा लागवडीसाठी तयारी सुरू झाली आहे. वाफे तयार करून त्यात बियाणे टाकून रोपवाटिका निर्मितीच्या कामांनाही कसमादे भागात हळूहळू वेग येत आहे.

द्राक्ष हंगामात गोडी बहर छाटणीनंतर बागा पोंगा तर काही फेलफुटीच्या अवस्थेत आहेत; मात्र त्यांचे पावसाच्या पार्श्‍वभूमीवर संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक फवारण्यांच्या कामांना वेग आल्याचे दिसून येत आहे; मात्र पावसामुळे फवारण्या करूनही परिणाम न मिळाल्याने शेतकऱ्यांवर नुकसान सोसण्याची वेळ आली आहे.

हाता-तोंडाशी आलेला घास वाया

कडक ऊन पडल्यानंतर आता शिवारांमध्ये शेतकरी पाण्यात जाऊन आडवा तेव्हा झालेला मका सोंगणी करून तो बाहेर आणण्याची धावपळ करत आहेत. तर दुसरीकडे सोयाबीनचे नुकसान जास्त असल्याने काळवंडलेली सोयाबीन ही बाहेर आणून आता वाढवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. शेंगांना पाणी लागल्याने त्या काळ्या पडून आतील दाणेही मोठ्या प्रमाणावर खराब झाले आहेत. काही ठिकाणी एकच पावसामुळे हाता तोंडाशी आलेला घास वाया गेला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com