E Peek Pahani : ई-पीक पाहणी केली, पण सातबारावर नोंदच दिसेना

यंदा ई-पीकपाहणी कार्यक्रम अधिक गतीने व जोमात प्रशासन, शासन राबवीत आहे. तलाठ्यांना पीक नोंद करण्याची कुठलीही सुविधा पोर्टलवर नाही.
E Peek Pahani
E Peek PahaniAgrowon

जळगाव ः ई-पीक पाहणी (E-Peek Pahani) कार्यक्रमाचा गाजावाजा, सहभागाचे आवाहन, प्रसिद्धी असा सपाटा मागील दोन महिन्यांपासून सुरूच आहे. प्रशासनातले अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचे ई-पीक पाहणीची प्रात्यक्षिके (E Peek Pahani Demonstration), त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. कौतुकही झाले. पण ई-पीकपाहणी करून २० ते २५ दिवस झाले, तरीदेखील अनेकांच्या सातबारा उताऱ्यावर पिकाची नोंद झालेली नाही.

E Peek Pahani
e-Vehicle : नाण्याची दुसरी बाजू

यंदा ई-पीकपाहणी कार्यक्रम अधिक गतीने व जोमात प्रशासन, शासन राबवीत आहे. तलाठ्यांना पीक नोंद करण्याची कुठलीही सुविधा पोर्टलवर नाही. फक्त शेतकरीच आपल्या पिकाची पीक नोंद ई-पीक पाहणीद्वारे करतील, अशी व्यवस्था आहे.

E Peek Pahani
E Peek Pahani : राज्यात २२ लाख हेक्टर क्षेत्राची ई-पीक पाहणी

शेतकरी तलाठ्याकडे पीक पेरा नोंदवायला गेल्यास त्यांना ई-पीकपाहणी अॅप व ई-पीकपाहणी कशी करावी, याची माहिती देऊन परत पाठविले जायचे. अनेक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली. जळगाव जिल्ह्यात सुमारे दीड लाख खातेदारांनी ई-पीक पाहणीत सहभाग घेतला. परंतु पिकाची नोंदच सातबाऱ्यावर अद्याप झालेली नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. ही नोंद का झाली नाही, याचे समाधान तहसील किंवा महसूल प्रशासन करीत नाही. कृषी विभाग ई-पीकपाहणी आपली जबाबदारी नाही, असे सांगून टोलवाटोलवी करतो. अशात शेतकऱ्यांत संभ्रम, नाराजी आहे.

आपल्या उताऱ्यावर २०२२-२३ साठी पीक नोंदच नाही. मग आपल्याला नुकसानभरपाई, पीकविमा योजनेतील सहभाग कसा शक्य आहे, असा प्रश्‍न, चिंताही आहे. कारण ई-पीक नोंद केली, पण यंदाचे क्षेत्र कागदोपत्री नापेर आहे. ई-पीक पाहणीसंबंधीचे सर्व्हर खराब झाले आहे. त्यात अडचणी असल्याने पीक नोंद सातबारा उताऱ्यावर अद्याप आलेली नाही. महाआयटी, एनआयसी स्तरावरचा हा मुद्दा आहे, असेही महसूलमधील सूत्रांनी सांगितले.

पीकविमा योजनेत कसा सहभाग घ्यायचा

सध्या सातबाराही ऑनलाइन अपडेट नाही. तांत्रिक अडचणी अनेक आहेत. त्यात ई-पीकपाहणीची समस्या अनेक दिवसांपासून यंदा आहे. सातबारावर नोंद नाही. पुढे फळपीक विमा योजनेत ऑक्टोबरमध्ये केळी उत्पादक सहभागी होतील. ऑक्टोबरमध्येही ही समस्या कायम राहिल्यास शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकणार नाहीत. कारण सातबारा उताऱ्यावर २०२२-२३ च्या केळी पिकाची नोंदच दिसणार नाही, असा मुद्दा शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

ई-पीकपाहणी करणे शेतकऱ्यांना बंधनकारक आहे. पीकपेरा नोंदीचे अधिकार शेतकऱ्याला आहे. ज्या नोंदी ई-पीकपाहणी करताना केल्या आहेत. त्याच सातबारा उताऱ्यावर येतील. तलाठ्यांना पीकपेरा नोंदीचे अधिकार नाहीत.
रमेश माळी, तलाठी, कानळदा, जि. जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com