
नागपूर ः ‘‘महावितरणची (Mahavitaran) आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे वसुलीशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट करीत चालू बिल (Electricity Bill) न भरणाऱ्या शेतकऱ्यांचे वीजजोड (Power Supply Cut Off) कापावेत,’’ असे निर्देश महावितरणचे कार्यकारी संचालक विजय सिंघल यांनी येथे दिले.
शुक्रवारी (ता. २५) नागपुरात सिंघल यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके, पुष्पा चव्हाण, राजेश नायक, सुनील देशपांडे उपस्थित होते.
वीजबिलाची थकीत वसुली हाच मुद्दा या बैठकीच्या अजेंड्यावर होता, असे सूत्रांनी सांगितले. सिंघल म्हणाले, ‘‘कंपनीची आर्थिक स्थिती अतिशय हलाखीची आहे. कंपनीवर प्रचंड कर्ज झाले आहे. नवीन कायद्यांमुळे कर्ज घेण्याची क्षमताही कमी झाली आहे.
त्यामुळे कंपनीचे अस्तित्व राखण्यासाठी आता वीजबिलाची वसुली अत्यावश्यक झाली आहे. घरगुती ग्राहकांसोबतच कृषिपंपाच्या थकीत रकमेचा आकडा मोठा आहे. त्यामुळे अशा थकीत ग्राहकांची वीज कापण्याशिवाय इतर कोणताच पर्याय कंपनीसमोर उरलेला नाही.’’
‘‘उपमुख्यमंत्र्यांनी सध्याचे बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित न करण्याची सूचना केली. त्यांना वगळून इतर कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करा. बिल न भरणाऱ्यांची वीज कापण्याशिवाय आता कोणताच पर्याय नाही,’’ असे सिंघल म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.