
चंद्रपूर : विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपूर या पाच जिल्ह्यांमधील कृषिपंप (Agriculture Pump) ग्राहकांना दिवसा (Day Time Electricity) १२ तास ३ फेज वीजपुरवठा (Power Supply) करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या बाबत केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे. राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने ३० नोव्हेंबर रोजीच्या पत्राद्वारे महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांना आदेशित केले आहे.
विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपूर हे पाच धान उत्पादक जिल्हे असून, शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात काम करताना वन्यप्राण्यांचा धोका असतो. तसेच कृषिपंपासाठी ८ तासांच्या वीज उपलब्धतेमुळे धानपिकास पुरेशा प्रमाणात सिंचन होत नाही.
कृषिपंपासाठी रोज ८ तासांच्या वीज उपलब्धतेऐवजी या जिल्ह्यातील कृषिपंपांना दिवसा १२ तास ३ फेज वीजपुरवठा करण्याची विनंती सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. उपमुख्यमंत्र्यांनी या विनंतीची त्वरित दखल घेत कृषिपंपांना दिवसा १२ तास ३ फेज वीजपुरवठा करण्याचे निर्देश दिले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.