Crop Damage : दीड महिन्यानंतरही अतिवृष्टीच्या नुकसानीची मदत नाही

२५८ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे
 Crop Damage
Crop DamageAgrowon

सोलापूर ः यंदा अतिवृष्टीने खरीप हंगामातील शेतीपिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. प्रामुख्याने ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या सलग तीन महिन्यात हे नुकसान झाले. त्यानंतर ऑगस्टमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुमारे १४७ कोटी रुपयांची मदत मिळाली. पण त्यानंतरच्या दोन महिन्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तरतूद केलेली २५८ कोटी रुपयांची मदत अद्यापही मिळालेली नाही.

 Crop Damage
Crop Damage : पीक नुकसानीची दोन वर्षांची मदत मिळेना

सोलापूर जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसला. खरिपातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि मटकी यासारख्या सर्वच पिकांचे त्यात नुकसान झाले. त्यातही सर्वाधिक सोयाबीनला फटका बसला. नुकसानीच्या या तीव्रतेमुळे पंचनामेही बरेच दिवस चालले. त्यामुळे आधी पंचनामे आणि पुन्हा नुकसानभरपाईचे प्रस्ताव यामध्ये बराच वेळ गेला

. पहिल्या टप्प्यात दिवाळी आधी मदत देऊ, असे आश्वासन देऊनही ऑगस्टमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत दिवाळीनंतरच मिळाली, पण त्यासाठीही तब्बल दोन-अडीच महिने गेले. त्यानंतरच्या दोन महिन्यात झालेल्या नुकसानीत तब्बल एक लाख ५३ हजार ७८१ शेतकऱ्यांच्या एक लाख २१ हजार ४३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुमारे २५८ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्यापैकी ३६ कोटी २ लाख रुपयांना मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात आले. पण त्यापैकीही एका रुपयाचे वाटप अद्यापही झालेले नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com