Crop Damage Compensation : नववर्ष आले तरी नुकसानभरपाईचा पत्ता नाही
अकोला ः जिल्ह्यात या वर्षात खरीप हंगामात सातत्याने पावसामुळे नुकसान (Crop Damage) झाले. प्रामुख्याने पीक काढणीच्या अवस्थेत झालेल्या पावसाने हंगामाची माती केली. पीकवाढ व उत्पादन घरात यायच्या काळात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी, संततधार पाऊस पडला. यामुळे ६० टक्क्यांवर हंगाम वाया गेला. या शेतकऱ्यांना मदतीची (Crop Damage Compensation) अद्याप प्रतीक्षा आहे. दोन महिन्यांत सुमारे २६२ कोटी रुपयांचे नुकसान झालेले असून, याचा अहवाल वरिष्ठांकडे गेलेला आहे.
जिल्ह्यात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी घास हिरावून घेतला. या पावसाने ९१ हजार ४०४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानीपोटी मदत म्हणून जिल्हा प्रशासनाने शासनाकडे १४२ कोटी ९६ लाख ८ हजार ८८४ रुपयांची मागणी केली होती.
ऑक्टोबर महिन्यातही जोरदार पाऊस झाल्याने नुकसानाचे तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांमार्फत संयुक्त पंचनामे झाले. ऑक्टोबर महिन्यात सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे ११९ कोटी ६२ लाख २९ हजार ३४४ लाख रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये १ लाख २९ हजार ५२ शेतकऱ्यांना फटका बसला.
८१ हजार ६७१ हेक्टरवरील जिरायती, बागायती व फळ पिकांचे नुकसान झालेले आहे. मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने ११९ कोटी ६२ लाख २९ हजार ३४४ रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. आता नागपूर हिवाळी अधिवेशनाची लगबग सुरू झाली आहे. या अधिवेशन काळात तरी मदत मिळेल अशी अपेक्षा होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.