
Aurangabad News : शेतकऱ्यांना आपली शेती करत असताना शेती निविष्ठांवर होणार खर्च शेतकऱ्यांनी कमी करायला हवा. सध्याच्या काळात शेतीमध्ये उत्पन्न (Agriculture Income) जास्त मिळवण्यासाठी अमाप खतांचा (Fertilizer Use) व कीडनाशकाचा वापर केला जात आहे.
ज्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चामध्ये वाढ झाली आहे. हा खर्च आपल्याला कमी करावा लागेल व नैसर्गिक शेतीकडे वळावे लागेल, असे मत प्रगतिशील शेतकरी दीपक जोशी यांनी व्यक्त केले.
वनामकृवि, परभणी कृषी विज्ञान केंद्र (Parbhani Krishi Vigyan Kendra), औरंगाबाद-१ यांच्यावतीने नुकताच ८३ वा शेतकरी शास्त्रज्ञ मंच कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रगतिशील शेतकरी दीपक जोशी, केव्हीके कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे व विषय विशेषज्ञ कृषी हवामानशास्त्र प्रा अशोक निर्वळ यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमामध्ये नैसर्गिक शेती काळाची गरज या विषयावर बोलताना श्री. जोशी म्हणाले, की शेतीसाठी होणार खर्च नियंत्रित झाला तर शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होईल. नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून देत, शेतकरी तरुण वर्गाने गट शेतीला प्राधान्य द्यावे, असा सल्ला देखील त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला.
यावेळी डॉ. झाडे यांनी पौष्टिक तृणधान्याचे एकात्मिक पीक पद्धतीतील महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. तृणधान्याचे मानवी आहारातील महत्त्व सांगितले. शेती करत असताना शेतकरी बांधवांनी शाश्वत उत्पादनासाठी शेतीपूरक व्यवसायाकडे वळावे असा सल्ला देखील त्यांनी दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन व्ही. एस. पतंगे यांनी केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.