सलाम किसान आणि वरद क्रॉप सायन्स यांनी संयुक्तरित्या गुरूवारी (ता. २) शेतकरी मेळाव्याचे (Shetkari melava) आयोजन केले आहे.
जालना जिल्ह्यातील वाठूर (ता. मंठा) येथे होणाऱ्या या मेळाव्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर (Shri Shri Ravishankar) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
`जलतारा- जलसंधारणातून ग्रामसमृध्दीकडे` ही या शेतकरी मेळाव्याची संकल्पना आहे. या मेळाव्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे.
या मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते व शेती क्षेत्रात विविध प्रयोग करणारे श्री श्री रविशंकर पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत.
या दोघांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभणार आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि सेवांचा पुरवठा करून त्यांना सक्षम करण्यासाठी ‘सलाम किसान' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘
सलाम किसान' हे एक सुपरॲप असून शेती मूल्यसाखळीतील सर्व घटकांना ‘एन्ड टू एन्ड सोल्युशन' पुरवण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
धनश्री मानधनी या ‘सलाम किसान'च्या संस्थापक आहेत. प्रद्युमन मानधनी हे कंपनीचे संचालक आहेत तर अक्षय खोब्रागडे हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.