
मंठा : तालुक्यात जुलै ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाच्या पिकाचे अतोनात नुकसान (Crop Damage) झाले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून महाराष्ट्र शासनाने प्रतिहेक्टर १३ हजार ६०० रुपये प्रमाणे जाहीर केलेली आहे. मात्र अजूनही शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान तात्काळ जमा करण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किसनराव मोरे यांनी केली आहे.
तालुक्यात शेतकऱ्याचे अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरिपाच्या पिकांबरोबरच अनेक ठिकाणी शेतातील माती वाहून गेली आहे. आजच्या परिस्थितीत अतिवृष्टीतून वाचलेल्या सोयाबीन व कपाशीच्या पिकाचे उत्पादनात खूप कमी प्रमाणात झाले आहे.
त्यातच आता सोयाबीन व कापसाचे दर कमी झाल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शासनाने १३ हजार ६०० रुपये प्रतिहेक्टर याप्रमाणे दोन हेक्टरपर्यंतची मर्यादा अनुदान देताना ठरवून दिली होती. तसेच अनुदान दीपावली पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र अतिवृष्टीचे अनुदान अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्याला अधिक वेठीस न धरता दुष्काळ अनुदान शेतकऱ्याला तात्काळ देण्यात यावे, जेणेकरून खुल्या बाजारात कापूस व सोयाबीन पिकाचे दरवाढ होईपर्यंत शेतकऱ्यास मदत होऊ शकते, असे श्री.मोरे यांनी नमूद केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.