नुकसान भरपाईसाठी केवळ ४०८ रुपये

शेतकऱ्यांना १ हजार रुपयांपेक्षा कमी नुकसान भरपाई देता कामा नये, असे शासनाचे निर्देश असतानाही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना ४०० ते ७०० रुपयेच मोबदला निश्चित करण्यात आला.
Crop Damage
Crop DamageAgrowon

नागपूर : शेतकऱ्यांना १ हजार रुपयांपेक्षा कमी नुकसान भरपाई (Crop Damage Compensation) देता कामा नये, असे शासनाचे निर्देश असतानाही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना ४०० ते ७०० रुपयेच मोबदला निश्चित करण्यात आला. जिल्ह्यातील काही गावांमध्ये तर एक हेक्टरही क्षेत्रातील पिकांचे नुकसान (Crop Damage) दर्शविण्यात आले नाही. एकप्रकारे शेतकऱ्यांची थट्टाच करण्यात येत असून, शासनाच्या आदेशाचीही पायमल्ली करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाकडून करण्यात आलेल्या पंचनामेच बोगस (Bogus Survey) असल्याचा आरोप आहे.

Crop Damage
Crop Damage: ओला दुष्काळ जाहीर करा: स्वाभिमानी शेतकरी संघटना

कळमेश्‍वर तालक्यातील मांडवा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या मांडवी गावातील शेतपिकांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पंचनामे करण्यात आले. साडेतीनशेवर शेतकऱ्यांच्या शेतातील पंचनामे करण्यात आले. गावातील एकाही शेतकऱ्याचे एक हेक्टरपेक्षा अधिकच्या क्षेत्रात नुकसान यात दाखविण्यात आले नाही. त्यामुळे एकाही शेतकऱ्याला केंद्राच्या निकषानुसार कोरडवाहू शेतीच्या नुकसानीसाठी ६८०० रुपये मिळण्याकरिता पात्र ठरविण्यात आले नाही. काही शेतकऱ्यांना तर नुकसानभरपाई फक्त ४०८ रुपये, ५४४ रुपये, ६१२ व ६८० रुपये दाखविण्यात आली.

Crop Damage
Crop Damage : अतिवृष्टीमुळे १.१५ लाख हेक्टरवर नुकसान

जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत काँग्रेस सदस्य प्रकाश खापरे यांनी हा खुलासा केला. असाच प्रकार इतरही अनेक गावात झाल्याची शक्यता आहे. काही गावांतील पिकेच वगळण्यात आली. कुही, भिवापूर तालुक्यातील मिर्ची व इतर पिकांचे नुकसान शून्य दाखविण्यात आल्याचा खुलासा दुधाराम सव्वालाखे यांनी केला. तर कामाठी तालुक्यात फुलशेतीचे प्रंचड नुकसान झाले असतानाही त्यांच्या नोंदी न करता नुकसानीच्या मदतीतून वगळण्यात आल्याची माहिती अवंतिका लेकुरवाळे यांनी दिली. यामुळे प्रशाकीय यंत्रणेकडून करण्यात आलेले पंचनामे बोगस असल्याचे आरोप होत आहे.

अनेक गावांतील पंचनामेच नाही

प्रशासकीय यंत्रणेकडून ३० जुलैपर्यंत अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात अनेक भागाचे पंचनामेच झाले नाही. त्यामुळे केंद्रीय पथकाला सादर करण्यात आलेली माहिती सदोष असून, कमी क्षेत्रात नुकसान दाखविण्यात आले. याचा फटका मदत मिळण्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

चुकीचे पंचनामे करण्यावर होणार का कारवाई

तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या संयुक्तरीत्या सर्वे करून पंचनामे करण्यात येते. त्यामुळे यांना चुकीच्या पद्धतीने हे सर्वे केल्याचे दिसून येते. त्यामुळे चुकीचे पंचनामे करणाऱ्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई होत की नाही, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com