Onion Rate : राज्य, केंद्र सरकार आमच्या प्रश्नांकडे पाहत नाही

जर या प्रश्नावर सकारात्मक तोडगा निघत नसेल तर आम्हाला स्वेच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी हतबलता चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Farmer Protest Chandwad
Farmer Protest ChandwadAgrowon

Farmer Protest News Chandwad नाशिक : कांदा (Onion Rate) द्राक्ष व भाजीपाला पिकाला कवडीमोल दर (Agriculture Produce Rate) मिळत आहे. केलेला उत्पादन खर्चही शेतकऱ्यांचा गेल्या वर्षात वसूल झालेला नाही.

त्यामुळे कुटुंब कस जगवायचे आणि पुन्हा पुढच्या हंगामात कसे उभे राहायचे, याकडे राज्य व केंद्र सरकार पाहायला तयार नाही.

त्यामुळे राष्ट्रपतींनी शेतकऱ्यांची मागणी विचारात घेऊन आम्हाला न्याय द्यावा, यासाठी आम्ही पत्र लिहिणार आहोत.

जर या प्रश्नावर सकारात्मक तोडगा निघत नसेल तर आम्हाला स्वेच्छामरणाची (Voluntary Suicide) परवानगी द्यावी, अशी हतबलता चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या नेतृत्वात कांदा, द्राक्ष व शेतीमालाच्या भावासाठी शुक्रवारी (ता. ३) सकाळी ११ वाजता उपोषण सुरू केले.

काँग्रेस तालुकाप्रमुख संजय जाधव, राष्ट्रवादीचे विजय जाधव, राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. झोपलेल्या सरकारच्या नाकाला कांदा लावून जागे करण्याची हीच वेळ असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. सकाळी शेतकऱ्यांनी घोषणा देत लिलाव काहीवेळ बंद पाडले होते.

Farmer Protest Chandwad
Onion Rate : ‘कांदा दरामध्ये सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा’

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, असे सांगणारे सरकार आता कुठे गेले, शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ का आली, मी सर्वसामान्य माणसाच्या मागे उभा आहे, असे मुख्यमंत्री सांगतात; मात्र शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे का उभे राहू शकत नाही, असा सवाल या वेळी कोतवाल यांनी केला.

Farmer Protest Chandwad
Onion Rate : शेतकरी अडचणीत असताना सरकार झोपले होते का?

राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर थापा मारण्याचे कामे करत असल्याचा आरोप करण्यात आला. शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नाही तोपर्यंत लोकप्रतिनिधींना गाव बंदी करा, असा असंतोष शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

सायंकाळी पाचपर्यंत उपोषण सुरू होते. तहसीलदार प्रदीप पाटील, बाजार समिती प्रशासक अनिल पाटील, सचिव गोरक्ष गांगुर्डे यांसह पोलिस प्रशासनाने भेट देत परिस्थिती समजून घेतली; मागण्यांवर विचार होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असे कोतवाल यांनी सांगितले.

केंद्र सरकार आता कुठे गेले?

ज्या वेळी कांदा पाच हजारांवर गेला, त्या वेळी सरकारने निर्यातबंदी करून कांदा आयात केला आणि रात्रीतून शेतकऱ्यांचा वांदा केला. हे केंद्र सरकार आता कांद्याला दर नसताना शेतकऱ्याला का दिलासा देऊ शकत नाही, असा सवाल युवा शेतकरी कैलास जाधव यांनी केला. आम्ही शेतकरी खासदारांना दिल्लीत पाठवू शकतो तर घरीसुद्धा बसवू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com