
आडुळ, जि. औरंगाबाद : पावसाच्या संततधारमुळे (Rainfall) आडुळ (ता. पैठण) सह परिसरातील मोसंबी फळबागांमध्ये (Sweet Orange Orchard) मोठ्या प्रमाणात फळगळ (Fruit Fall) होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान (farmers Loss) होत आहे. याविषयी मार्गदर्शनाची अपेक्षा मोसंबी उत्पादक (Sweet Orange Producer) व्यक्त करीत आहेत.
अगोदरच गगनाला भिडलेले मोसंबीचे भाव यंदा कमालीचे घसरल्याने शेतकरी संकटात सापडला होता. त्यात यंदा पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी परिसरात एक ही जोरदार पाऊस झाला नाही. गेल्या महिनाभर परिसरात रोज रिमझिम पाऊस पडत असल्याने कपाशी, तूर, बाजरी, मका, सोयाबीन ही पिके पिवळी पडून त्यांची वाढ खुंटली आहे. तर फळबागाधारक शेतकऱ्यांच्या मोसंबी, डाळिंब बागांना मगरी रोगाने ग्रासल्याने बागेतील अर्धे अधिक फळे गळून पडली आहेत.
आडुळ, कडेठाण, एकतुनी, घारेगाव, देवगाव, रजापूर, गेवराई, पारुंडी, सुलतानपूर, दाभरुळ, आडगाव, अंतरवाली खांडी, खादगाव येथे फळगळ प्रचंड प्रमाणात वाढली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मगरी रोग पडल्याने शेतकरी धास्तावले असून औषध फवारणी करूनदेखील प्रादुर्भाव कमी होत नसल्याने कृषी विभागाने परिसरात कृषी शास्त्रज्ञ बोलावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे व फळगळ झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना अर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.