
Maharashtra Day :४० वर्षांपासून प्रलंबित असलेला धरणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी करत धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र दिनी मुंबईच्या हुतात्मा चौकात आंदोलन (Farmer Protest) केले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना घेराव घालण्याचा प्रयत्नही आंदोलक शेतकरी करणार होते. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. आंदोलनादरम्यान, पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.
सोमवारी (ता. १) धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र दिनादिवशीच ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धरणाच्या प्रश्नी मुंबईच्या हुतात्मा चौकात ठिय्या आंदोलन केले. मात्र, परवानगी न घेता आंदोलन केल्यामुळे पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.
धुळे जिल्ह्यातील सात ते आठ गावांचा पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. या गावांना गेल्या ४० वर्षांपासून पाणी मिळत नाही, असा या शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक होत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हुतात्मा चौकातील शहिदांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी येणार होते. याच दरम्यान हे सर्व शेतकरी हुतात्मा चौक येथे आले होते. जोपर्यंत आमची मुख्यमंत्र्यांसोबत भेट होत नाही. आम्हाला पाणी मिळत नाही, तोपर्यंत आमचा आक्रोश असाच सुरू राहिल, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.
दरम्यान, आंदोलनाची परवानगी नसल्याने या सर्व आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, तुमची मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून देवू, असे पोलिसांकडून आंदोलकांना सांगण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.