Snake Bite : शेतकऱ्यांनो, सर्पदंशापासून घ्या काळजी

पावसाळा सुरू झाल्यामुळे शेतात काम करताना शक्यतो पायवाट सोडून जाऊ नये. गवतातून चालताना पायात बूट घालावेत. उंच गवतात वावर असणाऱ्या व्यक्तींनी नडगी व पोटरी यांचे संरक्षण करू शकतील अशी आवरणे बांधणे आवश्यक आहे.
snake bite
snake bite Agrowon

मंचर, जि. पुणे ः ‘‘पावसाळा सुरू झाल्यामुळे शेतात काम करताना शक्यतो पायवाट सोडून जाऊ नये. गवतातून चालताना पायात बूट घालावेत. उंच गवतात वावर असणाऱ्या व्यक्तींनी नडगी व पोटरी यांचे संरक्षण करू शकतील अशी आवरणे बांधणे आवश्यक आहे. घरात जमिनीवर झोपणे टाळावे. झोपेच्या आधी अंथरूण तपासावे. योग्य उपाय आणि सावधगिरी बाळगल्यास सर्पदंश (Snake Bite) व त्यामुळे होणारे मृत्यू रोखता येऊ शकतात. याबाबत समाजात जनजागृती करण्याचे काम आशा सेविकांनी करावे,’’ असे आवाहन जागतिक सर्पदंश समितीचे तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत (Dr. Sadanand Raut) यांनी केले.’’

snake bite
पावसाळ्यात जनावरांना होणारा सर्पदंश कसा टाळावा? | Snake bite In animals | ॲग्रोवन

मंचर (ता. आंबेगाव) येथे भारतीय आयुर्विज्ञान संशोधन प्रकल्पांतर्गत सर्पदंश टाळण्यासाठी व सर्पदंश झाल्यानंतर तातडीच्या उपाय योजनेबाबत आंबेगाव तालुक्यातील २५० आशा सेविका, सार्वजनिक स्वास्थ्य अधिकारी, गटप्रवर्तक यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्या वेळी डॉ. राऊत बोलत होते. पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, सर्पदंश तज्ज्ञ डॉ. पल्लवी राऊत या वेळी उपस्थित होत्या. या वेळी शून्य सर्पदंश प्रकल्पाचा माहितीपट दाखविण्यात आला.

snake bite
गायीला सर्पदंश झाल्यास कसं ओळखाल ? | हे उपाय करा!

डॉ. पल्लवी राऊत म्हणाल्या, ‘‘पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांत दोन हजार ५०० आशा सेविकांना सर्पदंश टाळण्यासाठी आवश्यक उपाय योजनांचे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे जनजागृती झाल्यानंतर सर्पदंश व मृत्यूचे प्रमाण घटण्यास मदत होईल. सर्पदंश झाल्यानंतर ताबडतोब रुग्णाला प्राथमिक उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात नेले पाहिजे. याबाबत जनजागृती हे काम अत्यंत महत्त्वाचे आहे.’’

‘‘गेली ३० वर्षे डॉ. राऊत दाम्पत्य यांच्यामुळे सर्पदंश झालेल्या हजारी रुग्णांचे प्राण वाचले आहेत. त्यांच्या कार्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली आहे. त्यांच्या शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्पासाठी राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सहकार्य करणार आहेत,’’ असे विवेक वळसे पाटील यांनी सांगितले. डॉ. तुषार पवार यांनी आभार मानले.

भारतामध्ये दर वर्षी २७ लाख लोकांना सर्पदंश होतो. ५० हजार लोकांचा मृत्यू होतो. सर्पदंशाचे बहुतांश रुग्ण गरीब तरुण शेतमजूर, महिला व मुले असतात. पावसाळ्यात याबाबत गाव व वाड्या वस्त्यांवर जनजागृती मोहीम राबविणे गरजेचे आहे.
डॉ. सदानंद राऊत, तज्ज्ञ, जागतिक सर्पदंश समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com