Rice Procurement : तेलंगणातील तांदूळ खरेदीस एफसीआयचा होकार

भारतीय अन्न महामंडळाने (FCI) तेलंगणातील कस्टम मिल्ड तांदूळ खरेदी करण्याची तयारी दाखवली आहे. तसे पत्र तेलंगणाच्या नागरी पुरवठा मंडळाच्या उपाध्यक्षांना पाठवले आहे.
Rice
Rice Agrowon

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या (PMGKAY) अंमलबजावणीवरून केंद्र सरकार आणि तेलंगणामध्ये रंगलेल्या वादावर अखेर पडदा पडला.तेलंगणा सरकारने केंद्राच्या योजनेनुसार मोफत तांदूळ वाटप करणार असल्याचे पत्र भारतीय अन्न महामंडळाकडे (FCI) सोपवले. तर केंद्र सरकारने तांदूळ खरेदी प्रक्रिया पुन्हा सुरु करण्याची ग्वाही राज्याला दिली.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) राबवण्याची तयारी दर्शवल्यामुळे केंद्र सरकारने तेलंगणातील कस्टम मिल्ड तांदूळ खरेदीची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे तेलंगणातील तांदूळ खरेदी प्रक्रियेबाबतची अनिश्चितता अखेर संपुष्टात आली. भारतीय अन्न महामंडळाने (FCI) तेलंगणातील कस्टम मिल्ड तांदूळ खरेदी करण्याची तयारी दाखवली आहे. तसे पत्र तेलंगणाच्या नागरी पुरवठा मंडळाच्या उपाध्यक्षांना पाठवले आहे.

साठवणुकविषयक नियमावलीचे उल्लंघन झाल्याचे कारण समोर करत भारतीय अन्न महामंडळाने (FCI) तेलंगणातील तांदळाची हमीभावाने (MSP) खरेदी करणे थांबवले होते. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची (PMGKAY) अंमलबजावणी करण्यास नकार दिल्यामुळेच तेलंगणातील तांदूळ खरेदी थांबवण्यात आली असल्याचा दावा राज्याकडून करण्यात येत होता.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत केंद्र सरकार लाभार्थ्यांना दरमहा प्रति व्यक्ती ५ किलो तांदूळ देण्यात येतो. तेलंगणा सरकारने एप्रिल आणि मे २०२२ या दोन महिन्यासाठी म्हणून १.९० लाख टन तांदूळ या योजनेसाठी म्हणून घेतला मात्र त्याचे वाटपच केले नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून राज्यातील तांदळाची खरेदी थांबवण्यात आली.

अखेर तेलंगणा सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भातील पत्र केंद्र सरकारकडे रवाना केले. त्यानंतर भारतीय अन्न महामंडळाने तेलंगणातील तांदूळ खरेदीची प्रक्रिया पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान राज्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत तांदळाचे वाटप न झाल्याने राज्याकडील तांदळाचा साठा मोठ्या प्रमाणात वाढला. राज्यभरातील बहुतांशी गोदामांची साठवणुक क्षमता संपली. तेलंगणाकडील तांदळाचा साठा ९४ लाख टनांवर गेला. त्यामुळे राज्य सरकारकडून १० लाख टन तांदळाचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला.

साठवणुकविषयक निकषांचे पालन होत नसल्याचे सांगत भारतीय अन्न महामंडळाने राज्यातील काही मिल्सवर धाडी टाकल्या. त्यात मिल्समधील तांदळाचा साठा जुना असल्याचेही निदर्शनास आले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com