Crop Insurance : पंधरा हजार शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत

पुसद तालुक्यातील स्थिती; नुकसान भरपाईसाठी ५८ हजार तक्रारी
रत्नागिरीत साडेतीन हजार  शेतकऱ्यांनी काढला पीकविमा  Three and a half thousand in Ratnagiri Farmers took out crop insurance
रत्नागिरीत साडेतीन हजार  शेतकऱ्यांनी काढला पीकविमा  Three and a half thousand in Ratnagiri Farmers took out crop insurance

आरेगाव, यवतमाळ : यंदाचा खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून प्रती हेक्टर साडेतेरा हजार रुपये एवढे अनुदान तालुक्यातील अकरा मंडळांपैकी आठ मंडळांत वितरित करण्यात आले. तर उर्वरित तीन मंडळांत तेहतीस टक्के नुकसान भरपाईचा निकष लावून अनुदान देण्यात आले. सोबतच पंधरा हजार शेतकरी विमा भरपाईपासून वंचित आहेत.

रत्नागिरीत साडेतीन हजार  शेतकऱ्यांनी काढला पीकविमा  Three and a half thousand in Ratnagiri Farmers took out crop insurance
Crop Insurance : पीक विम्याच्या पूर्वसूचनाकडे शेतकऱ्यांची पाठ ?

पुसद तालुक्यातील बासष्ट हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. यापैकी ५८ हजार शेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसानीच्या संदर्भात तक्रारी दाखल केल्या होत्या. परंतु आतापर्यंत केवळ त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली असून, तक्रार करणारे पंधरा हजार शेतकरी पीक विम्याच्या मदतीपासून वंचित आहेत. पीक विम्याचा लाभ देण्यात आलेल्या शेतकऱ्यांना देखील तुटपुंजी मदत देण्यात आल्याने शेतकरीवर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे. पीक विमा कंपनीकडून तक्रार केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पाहणी करण्यासाठी आलेल्या प्रतिनिधींनी शेतकऱ्याकडून शंभर रुपयांपासून पाचशे रुपये घेऊन पंचनाम्यात नुकसान वाढवून दाखवण्याचे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र अल्पशी रक्कम खात्यात जमा करण्यात आली असल्याची चर्चा शेतकरीवर्गात रंगत आहे.

रत्नागिरीत साडेतीन हजार  शेतकऱ्यांनी काढला पीकविमा  Three and a half thousand in Ratnagiri Farmers took out crop insurance
Crop Insurance : पीकविमा तत्काळ मिळण्यासाठी शेतकरी आक्रमक

‘शेतकऱ्यांचा रोष अधिकाऱ्यांवर’

कृषी विभाग शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी व्हावे याकरिता जनजागृती करते. परंतु पीक विमा कंपनीकडून कृषी विभागाला कोणत्याही मदतीची यादी, शेतकरी संख्या, मदतीचे निकष आदींबाबत माहिती देण्यात येत नसल्याने शेतकऱ्यांचा रोषाला कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारीवर्गाला सामोरे जावे लागते. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी पीक विमा कंपनीला कृषी विभागाकडे माहिती देण्याचे निर्देश दिले असले तरी संबंधितांकडून माहिती प्राप्त झाली नसल्याचे तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com