
भंडारा : जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी (Heavy Rain In Bhandara) आणि गोंदिया व मध्य प्रदेशातील प्रकल्पांमधून सुरू असलेल्या विसर्गामुळे जिल्ह्यातील नद्यांना पूर (Flood) आलेला असून, काही मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान गोसेखुर्द धरणाची (Gosekhurd Dam) ३३ दारे एक ते दीड मीटरने उघडण्यात आल्यामुळे पवनी, लाखांदूर तालुक्यांत वैनगंगेला पूर (Vainganga River Flood) आलेला आहे.(Monsoon News updates)
गेल्या २४ तासांत भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यात तुमसर तालुक्यात १४८ आणि लाखांदूर तालुक्यात १३५ मिलिमीटर पाऊस झाला. भंडारा व लाखनी वगळता सर्वच तालुक्यांत अतिवृष्टी झाली असून, अनेक मार्गातील नाले व नद्यांना पूर आला आहे.
मध्य प्रदेश व गोंदिया जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने वैनगंगेला पूर आला आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने धरणाची सर्व ३३ दारे उघडण्यात आली आहेत. आज दुपारी या धरणाची १२ दारे दीड मीटरने तर, २१ दारे एक मीटरने उघडण्यात आली असून, ८३७२.३७ क्युमेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे पवनी व लाखांदूर तालुक्यातील वैनगंगा, चुलबंद नद्या व नाल्यांना पूर आलेला आहे. मोहाडी, बोरगाव येथे पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाने नद्यांच्या काठावरील गावातील नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.