
अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे : खेड तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या चासकमान धरणातून (Chaskman Dam) रब्बी हंगामात (Rabbi Season) शेतीसाठी ‘टेल टू हेड’नुसार पहिले आवर्तन सुरू करण्यात आले आहे. डाव्या कालव्यास धरणातून ४५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असल्याने शिरूर, खेड तालुक्यांतील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
चासकमान धरणांतील पाण्याची उपयुक्त पाण्याची क्षमता ७.५८ टीएमसी एवढी आहे. पावसाळ्यात पश्चिम भागात झालेल्या पावसामुळे धरणे भरून वाहिले होते. सध्या धरणात सात टीएमसी म्हणजेच सरासरी ९२.३९ टक्के एवढा पाणीसाठा आहे. परंतु रब्बी हंगाम सुरू असल्याने खेड, शिरूर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी रब्बी पिकांसाठी धरणांतून पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार पाटबंधारे विभागाकडून नुकतेच पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना ‘टेल टू हेड’ या पद्धतीने पाण्याचे वितरण करण्यात येणार आहे.
खेड तालुक्यातील चासकमान धरणापासूनचा पूर्व भाग आणि शिरूर तालुक्यातील शेतकरी डाव्या कालव्यातील पाण्यावर विविध पिके घेत असतो. यंदाही शेतकऱ्यांनी हरभरा, गहू, ज्वारी, सूर्यफूल, मका, फळबागा घेतल्या आहेत. त्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असल्याने या धरणांतील पाण्यावर शेतकरी अवलंबून असतो. सोडलेल्या पाण्याचा कालावधी निश्चित नसल्याने शेतकरी वर्ग संभ्रमात असून मे महिन्यापर्यंत पाणीसाठा ठेवणे गरजेचे आहे. त्यानुसार पाटबंधारे विभागाला योग्य ते नियोजन करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.