Rabi Sowing : रब्बी, उन्हाळीसाठी पूर्ण क्षमतेने पाणी मिळणार

ऊर्ध्व पैनगंगा (इसापूर) धरणात १५ ऑक्टोबर रोजी शंभर टक्के पाणीसाठा होणार आहे. उपलब्ध पाणीसाठ्याच्या अनुषंगाने ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात रब्बी व उन्हाळी हंगाम पूर्ण क्षमतेने राबविण्याचे नियोजन आहे.
Rabi Season
Rabi SeasonAgrowon

नांदेड : ऊर्ध्व पैनगंगा (इसापूर) धरणात (Uppar Painganga Dam) १५ ऑक्टोबर रोजी शंभर टक्के पाणीसाठा (Water Storage) होणार आहे. उपलब्ध पाणीसाठ्याच्या अनुषंगाने ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात रब्बी (Rabi Season) व उन्हाळी हंगाम पूर्ण क्षमतेने राबविण्याचे नियोजन आहे. यास कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर पाणीपातळी सोडण्याची कार्यवाही होणार आहे. प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रांतील शेतकऱ्यांनी यांची नोंद घ्यावी, असे असे ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता अ. बा. जगताप यांनी कळविले आहे.

Rabi Season
Rabi Jowar Sowing : अठरा हजार हेक्टरवर जतमध्ये ज्वारीची पेरणी

पावसाचे प्रमाण यंदा समाधानकारक असल्यामुळे ऊर्ध्व पैनगंगा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या प्रकल्पाचा लाभ नांदेड, हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळतो. या प्रकल्पात ऑक्टोबरअखेर पाणीपातळी ४४१ मीटर (१०० टक्के) ठेवण्याचे निर्धारित आहे. यामुळे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी पाणी पाळ्यांचे नियोजन सुरू केले आहे. सन २०२२-२३ च्या शासन निर्णयातील प्रचलित दरानुसार पाणीपट्टीचे दर आकारण्यात येतील.

Rabi Season
Rabi Sowing : सव्वीस लाख हेक्टरवर रब्बी प्रस्तावित

थकीत व चालू पाणीपट्टी वेळेत भरावी. पाणीपाळी सुरू असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टरद्वारे पाणीउपसा करणे अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता कार्यालयाने कळविले आहे.

पाणी मागणी अर्ज सादर करा

यंदा रब्बी, दुहंगामी व इतर बारमाही पिकांसाठी ज्यांना पाणी घ्यायचे आहे. त्यांनी पाणी मागणी अर्ज विहित नमुन्यात ३१ ऑक्टोबरपूर्वी संबंधित शाखा कार्यालयात माहिती भरून सादर करावेत, पिकाचे मागणी क्षेत्र २० आरच्या पटीत असावे, कालवा संचलन कार्यक्रमानुसार पाणी घेणे बंधनकारक राहील, पाणीपट्टी न भरणाऱ्या व पाणी अर्ज नामंजूर असलेल्या लाभधारकांस सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयास बंधनकारक राहणार नाही, काही अपरिहार्य कारणास्तव पाणीपुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही, लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे, असे कळविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com