Ajit Pawar: नैसर्गिक संकटात सरकार जनतेच्या उपयोगी पडावे: अजित पवार

राज्यात पूर, वादळ, अतिवृष्टीचे नैसर्गिक संकट (Natural Calamity) आले आहे. अशा स्थितीत मंत्रिमंडळ विस्तार करायला हवा. पालकमंत्री नेमून जिल्ह्यात प्रशासकीय नियोजन करायला हवे.
Ajit Pawar
Ajit PawarAgrowon

नगरः ‘‘सरकार येत-जात असते. हे राज्य सरकार किती दिवस चालेल सांगता येत नाही. राज्यात केवळ दोन जण सरकार चालवत आहेत. राज्यात पूर, वादळ, अतिवृष्टीचे नैसर्गिक संकट (Natural Calamity) आले आहे. अशा स्थितीत मंत्रिमंडळ विस्तार करायला हवा. पालकमंत्री नेमून जिल्ह्यात प्रशासकीय नियोजन करायला हवे. मात्र तसे होताना दिसत नाही. असे कसे चालेल. हे सरकार राज्यातील जनतेला नैसर्गिक संकटात मदत करत नसेल तर काय उपयोग?, असा प्रश्न राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला.

अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत माजी मंत्री मधुकरराव पिचड व आमदार वैभव पिचड यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीने शेतकरी समृद्धी मंडळ नावाचा पॅनल उभा केला आहे. या पॅनलचा प्रचार करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार शुक्रवारी (ता. १५) अकोल्यातील विठ्ठल लॉन्स येथे आले होते. या सभेत त्यांनी मधुकरराव पिचड (Madhukarrao Pichad) यांच्यावर जोरदार टीका केली.

अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पिचड पिता-पुत्रांना महाविकास आघाडीने आव्हान देत पॅनल उभा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांंच्या पतसंस्थांची चौकशी करावी या मागणीचे पत्र पिचड समर्थकांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पाठविण्यात आले. या पत्राची प्रत पॅनलच्या प्रचारसभेत मतदारांना दाखवत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पिचड समर्थकांना सुनावले.

Ajit Pawar
Rain Updates: नाशिक जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात दाणादाण

अजित पवार म्हणाले, केंद्रात व राज्यात माझे सरकार आहे म्हणजे मी काहीही करायचे काय? सरकार येते-जाते कोणी ताम्रपट घेऊन आलेला नाही. राज्यात कायदा, तपास यंत्रणा आहेत. दोषी वाटत असेल तर तपास यंत्रणा चौकशी करतील. दोषी असेल तर कारवाई होईल. आम्ही सत्तेत असताना राज्यात कोणावर चौकशी लावली नाही अथवा कारवाई केली नाही. कारभार चुकीचा असेल तर सभासद निर्णय घेतील. संचालक मंडळ हे विश्वस्त आहे. सभासद शेतकरी हे साखर कारखान्याचे मालक आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

कुणी चुकले तर माझ्याशी गाठ

शेतकरी समृद्धी मंडळाच्या पॅनलमध्ये नव्या जुन्याचे मिश्रण आहे. केवळ नवीन अथवा केवळ जुने संचालक चालत नाहीत. या पॅनलने सत्ता आल्यावर समन्वयाने काम करावे. कोणी चुकला तर माझ्याशी गाठ आहे. घरात भांड्याला भांडे लागते. अशा स्थितीत मी चर्चा करून निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com