Grape Season : सांगली जिल्ह्यात द्राक्ष हंगामास प्रारंभ

सांगली ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील फळ छाटणीवर परतीच्या पावसाचे संटक ओढावले होते. त्यातूनही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत काटेकोर नियोजन करून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बागा उत्तमरीत्या फुलवल्या आहेत.
Grape Season
Grape SeasonAgrowon

सांगली ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील फळ छाटणीवर (Grape Pruning) परतीच्या पावसाचे संटक ओढावले होते. त्यातूनही द्राक्ष उत्पादक (Grape Farmer) शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत काटेकोर नियोजन करून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बागा उत्तमरीत्या फुलवल्या आहेत. सावळज (ता. तासगाव) येथील अंकुश माळी यांनी पेपर आच्छादन केलेल्या बागेतील द्राक्षांची काढणी (Grape Harvesting) सुरू केली आहे. जिल्ह्यातील हंगामास प्रारंभ झाला आहे. यंदाच्या द्राक्षाचा हंगामास जानेवारी महिन्यापासून गती येणार असल्याची शक्यता आहे.

Grape Season
Grape Advisory : पाकळ्यांची वाढ, मण्यांचा आकार वाढविण्यासाठी उपाययोजना

जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील आगाप फळ छाटणी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून पावसामुळे फळ छाटणी केलेल्या बागांचे नुकसान झाले होते. त्यामुळे आगाप फळ छाटणी करण्यास शेतकरी पुढे आले नसल्याचे चित्र होते. मात्र ज्या शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेला पेपर आच्छादन केले आहे, त्या शेतकऱ्यांनी जून-जुलै महिन्यात फळछाटणी केली होती.

त्याचे प्रमाण अत्यल्प होते. दरम्यान, जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सप्टेंबर महिन्यात सुरू केली असून, १५ टक्के क्षेत्रावर छाटणी झाली होती. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात ७५ टक्के क्षेत्रावर तर १० टक्के नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांनी फळ छाटणी घेतली आहे.

Grape Season
Grape Advisory : घटत्या तापमानात द्राक्ष बागेत करावयाचे नियोजन

सप्टेंबर महिन्यात घेतलेल्या फळ छाटणीला परतीच्या पावसाचा फटका बसला. यामुळे घड जिरणे, घड कुज यासह करपा रोगाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी बागांना पेपर आच्छादन केले, त्या बागांना या परतीच्या पावसाचा फटका बसला नसल्याने या बागा नुकसानीपासून वाचल्या आहेत.

त्यामुळे या बागेतील द्राक्षांची काढणी सुरू झाली आहे. सध्या द्राक्षाला प्रति पेटीस (चार किलोची पेटी) ३९५ रुपये असा दर मिळत आहे. वास्तविक पाहता, यंदा फळछाटणी उशिरा झाल्याने द्राक्षाचा हंगामास जानेवारी महिन्यापासून गती येईल, अशी शक्यता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सध्या द्राक्ष बागेला पोषक असे वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे. मात्र सकाळी बागेवर दव पडत असल्याने शेतकऱ्यांची काहीशी चिंता वाढत असली, तरी शेतकरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काळजी घेत आहे. सप्टेंबरमध्ये पावसामुळे नुकसान झाले असल्याने या कालावधीत केलेल्या फळ छाटणीस माल कमी राहण्याचा अंदाज आहे.

पाऊस, वातावरणातील बदल यामुळे द्राक्ष बागेचे नुकसान होऊ नये यासाठी बागेला पेपर अच्छादन केले आहे. जुलै मध्यावर फळछाटणी केली आहे. परतीच्या पावसाने बागेचे नुकसान झाले नाही. द्राक्षाची काढणी सुरू आहे. दरही चांगला मिळतोय.
अंकुश माळी, सावळज, ता. तासगाव
सध्या पेपर आच्छादनातील द्राक्षाची काढणी सुरू आहे. जिल्ह्यात द्राक्षाच्या हंगामास जानेवारीपासून गती येईल. परंतु सप्टेंबरमधील फळ छाटणी केलेल्या बागातून माल कमी निघेल अशी शक्यता आहे.
संजय बरगाले, विभागीय अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ, सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com