Hapus Season : हापूसचा हंगाम यंदा तीन महिने राहणार

मॉन्सून परतल्यानंतर जिल्ह्यात थंडीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सध्याचे वातावरण हापूसला पोषक असून १५ नोव्हेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यातील मोहोर येण्यास सुरुवात होईल.
Hapus Mango
Hapus MangoAgrowon

रत्नागिरी ः मॉन्सून (Monsoon) परतल्यानंतर जिल्ह्यात थंडीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सध्याचे वातावरण हापूसला पोषक (Favorable Weather For Hapus Mango) असून १५ नोव्हेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यातील मोहोर (Mango Blossom) येण्यास सुरुवात होईल. वातावरण असेच अनुकूल राहिल्यास यंदा तीन महिने हापूसचा हंगाम राहील. दरवर्षी दोन किंवा अडीच महिने हंगाम राहिल्यामुळे आंबा बागायतदारांना आर्थिक झळ पोहोचत होती.

Hapus Mango
Mango Crop Insurance : कोकण सोडून इतर भागांतील आंबा पिकासाठी विमा योजना

अनियमित पावसामुळे आंबा, काजू बागायतदारांसह अन्य फळपीक घेणाऱ्या जिल्ह्यातील बागायतदारांचे नियोजन व त्यानुसार केली जाणारी आर्थिक गणिते बिघडू लागली आहेत. दिवाळीच्या पूर्वसंध्येपर्यंत मॉन्सूनचा पाऊस होता. त्यानंतर थंडीला सुरुवात झाली. गेले आठवडाभर चांगले वातावरण आहे. कडकडीत उन्हामुळे भातशेतीच्या कामांनाही वेग आला आहे.

थंडी आणि वारा असे पोषक वातावरण असल्यामुळे हापूसच्या कलमांना लवकरच मोहोर येण्यास सुरुवात होईल, असा अंदाज आंबा बागायतदारांकडून व्यक्त केला जात आहे. यावर्षी जून, जुलैमध्ये कलमांना पालवीच फुटलेली नव्हती. सध्या ४० टक्के झाडांना पालवी फुटलेली असून उर्वरित ६० टक्के झाडांच्या फांद्या जून आहेत.

Hapus Mango
Mango Blossom : रत्नागिरीत आंबा बागेतील दोन कलमांना मोहोर

पाऊस लांबल्यामुळे यावर्षी पंधरा दिवस उशिराने मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे; परंतु याचा परिणाम पहिल्या टप्प्यातील आंब्यावर होणार नाही. फेब्रुवारीच्या अखेरिस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आंबा बाजारात दिसू लागेल. ही बागातदारांसाठी दिलासादायक गोष्ट आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यातील मोहोर दिसू लागेल. त्यानंतर डिसेंबर महिन्यात मोहोरे येईल. सुरुवातीची मोहोरणारी झाडे ही कातळावरील किंवा डोंगर उतारावरील असतील.

आंबा हंगाम खऱ्या अर्थाने मार्च, एप्रिल व मे अशा तीन महिन्यांत असतो. बदलत्या वातावरणामुळे हा हंगाम कधी दोन महिने तर कधी अडीच महिन्यांवर आलेला आहे. गतवर्षी दोनच महिने आंबा बाजारात होता. जून महिन्यातील आंब्यामधून म्हणावे तेवढे उत्पन्न मिळत नाही. बराचसा आंबा हा कॅनिंगसाठी दिला जातो.

मार्च महिन्यात आंब्याला दर चांगला मिळतो. या कालावधीत बागायतदारांचे उत्पादन हाती आले तर हंगामाचे आर्थिक गणित सुरळीत राहते. गेल्या काही वर्षात अशी परिस्थिती नव्हती. मात्र गतवर्षी दर एप्रिलच्या मध्यापर्यंत समाधानकारक होता. त्यानंतर तो घसरत गेला. दरवर्षीप्रमाणे हंगामाचे चित्र हे वातावरणातील बदलांवर अवलंबून असते. त्यामुळे पुढील तीन महिन्यात अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण कसे राहील यावरच सर्वकाही अवलंबून असणार आहे.

सध्याचे वातावरण हापूसला पोषक आहे. जिथे कलमांना मोहोर आला आहे, तेथे काळजी घेतली जात आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा हापूसची स्थिती चांगली राहील. आंबा बाजारपेठांत तीन महिने राहील.
टी. एस. घवाळी, बागायतदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com