
Crop Damage News भोर, जि. पुणे ः तालुक्याच्या वीसगाव खोऱ्यातील खानापूर येथील दोन शेतकऱ्यांच्या ज्वारीच्या पिकांचे (Jowar Crop) रानडुकरांच्या कळपाने (Wild Boar Herd) नुकसान केले. सोपान थोपटे आणि मारुती थोपटे यांची गावच्या डोंगर उतारावर असलेल्या ज्वारीचे शेत असून, रानडुकरांच्या उपद्रवामुळे हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाले आहे.
सध्या तालुक्यात रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, कांदा आदी पिके जोमात आली आहेत. पुढील काही दिवसात पिके काढणीसाठी येतील. परंतु मागील आठवड्यापासून पिकांमध्ये रानडुकरांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे.
काही शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान कमी झाल्याने त्यांनी वन विभागाकडे तक्रार केली नाही.
परंतु सोमवारी (ता.२०) रात्री सोपान थोपटे यांच्या निम्म्याहून अधिक शेताचे रानडुकरांनी नुकसान केले. आणि हातातोंडाशी आलेले ज्वारीचे पीक नष्ट केले. १५ ते २० रानडुकरांच्या कळपाने येऊन एका रात्रीत पिकांचे नुकसान करतात.
यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. वन विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
याबाबत भोरचे वनपरीक्षेत्र अधिकारी दत्तात्रेय मिसाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की पिकांची नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी वन विभागाकडे भरपाईसाठी अर्ज करावेत.
वन विभागाकडून पिकांची पाहणी करून पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार भरपाई देण्यात येणार असल्याचे सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.