Crop Damage Compensation : हिरड्याची नुकसान भरपाई मिळणार

किसान सभेच्या राज्य समितीच्या नेतृत्वाखाली विविधप्रश्नी अकोले ते लोणी असा सुमारे पंधरा हजार शेतकऱ्यांचा पायी मोर्चा नुकताच काढण्यात आला होता.
Hirda Crop
Hirda CropAgrowon

Pune News : किसान सभेच्या (Kisan Sabha) राज्य समितीच्या नेतृत्वाखाली विविधप्रश्नी अकोले ते लोणी असा सुमारे पंधरा हजार शेतकऱ्यांचा पायी मोर्चा नुकताच काढण्यात आला होता. या आंदोलनाची राज्य शासनाने दुसऱ्याच दिवशी गंभीर दखल घेऊन पुणे जिल्ह्यातील हिरडा नुकसानीचे जे पंचनामे झाले आहेत.

त्याची जवळपास पंधरा कोटी रक्कम ही आदिवासी (Tribal Farmer) भागातील, शेतकऱ्यांना अदा केली जाईल असा महत्त्वपूर्ण निर्णय झाला अशी माहिती किसान सभेचे जिल्हा समितीचे नेते डॉ. अमोल वाघमारे यांनी दिली.

श्री वाघमारे म्हणाले, की पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर व खेड व नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आदिवासी भागात खासगी जमीन क्षेत्रावर तसेच जंगलात हिरड्याची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत.

Hirda Crop
Crop Damage Survey : पिकांच्या पंचनाम्यास विलंब

या भागातील जनतेसाठी नगद रक्कम प्राप्त करून देणारे हे हिरडा महत्त्वाचे औषधी फळ आहे. या तिन्ही तालुक्याच्या आदिवासी भागातील सुमारे १५ ते २० हजार कुटुंबाच्या उपजीविकेचे मुख्य उत्पनाचे साधन हा बाळहिरडा आहे. परंतु शासनाच्या विविध धोरणामुळे येथील आदिवासी शेतकऱ्यांना सातत्याने नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

किसान सभेच्या, पुणे जिल्हा समितीच्या नेतृत्वाखाली, सन २०२० पासून ही नुकसान भरपाई मिळावी म्हणून, आदिवासी विकास विभाग, तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावर विविध आंदोलने करून या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यात आला होता.

Hirda Crop
Crop Damage : वादळी पाऊस, गारपिटीने पिकांची धुळधाण

मार्च २०२१ मध्ये शेकडो शेतकऱ्यांनी मा.मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून, या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. परंतु ही नुकसान भरपाई अद्याप मिळाली नव्हती.

अकोले ते लोणी या आयोजित केलेल्या मोर्चात विश्वनाथ निगळे, अशोक पेकारी, लक्ष्मण जोशी, मुकुंद घोडे, रामदास लोहकरे, दत्ता गिरंगे, अशोक जोशी, मच्छिंद्र वाघमारे, गणपत घोडे, रोहित बोऱ्हाडे, संदीप शेळकंदे, अर्जुन काळे यांच्यासह जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील शेकडो हिरडा उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.

नुकसानग्रस्त शेतकरी स्थिती...

जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील आदिवासी समाजाचे, मुख्य उत्पनाचे साधन असलेल्या बाळहिरडा या औषधी फळाचे ही यावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. शासनाच्या सूचनेनुसार स्थानिक प्रशासनाने हिरडा नुकसानीचे पंचनामे केले होते.

एकट्या आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील, ४३ गावातील सुमारे ३१९८ व जुन्नर तालुक्यातील सुमारे ८०० पेक्षा अधिक शेतकरी बांधवांचे हिरड्याच्यां नुकसान भरपाईचे पंचनामे २०२० साली झाले होते. परंतु ही नुकसान भरपाई अद्याप मिळाली नव्हती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com