
नांदेड : केंद्र सरकारने सोयाबीन (Soybean), चना (Chana), तूर, गहू या पिकांसह नऊ शेतीमालावर लावलेल्या वायदा बाजार बंदीला (Vayadebandi) दिलेली मुदतवाढ रद्द करा, अन्यथा मुंबई येथील ‘सेबी’ (SEBI कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी होणार असल्याचा इशारा स्वतंत्र भारत पक्षाने केंद्र सरकारला दिला.
स्वतंत्र भारत पक्षाने २३ जानेवारीपासून बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील ‘सेबी’च्या मुख्य कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन जाहीर केले आहे. या आंदोलनातील सर्व मागण्या शेतकरी संघटनेला मान्य आहेत.
शेतकऱ्यांना मारक असलेल्या वायदेबंदीला एक वर्ष मुदतवाढ देण्यात येणारा निर्णय ‘सेबी’ने तातडीने मागे घ्यावा व सर्व शेतीमालाचे वायदे सुरू ठेवावेत. तसे झाले नाही तर २३ जानेवारीपासून ‘सेबी’च्या मुख्य कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल.
या आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. धोंडीबा पवार, शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे, आर. पी. कदम यांनी दिली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.