
अमरावती ः शेतकऱ्यांकडून गव्हाला (wheat) पर्याय आणि तुलनेत कमी पाण्यात येणारे पीक (Crop) म्हणून राजमाला पसंती मिळत आहे. मात्र बाजारपेठ, खरेदीदार नसल्याने गेल्या काही वर्षांत शेतकरी (Farmer) या पिकापासून दुरावत चालल्याचे चित्र महाराष्ट्रात असल्याचा दावा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी केला आहे. विशेष म्हणजे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने या पिकाच्या चाचण्याही शेतकऱ्यांच्या शेतावर घेतल्या होत्या.
सातारा, मान, खटाव, कोरेगाव आटपाडी या भागात पूर्वी खरिपात राजमा क्षेत्र सर्वाधीक होते. वळूज बाजारपेठेत दिल्लीचे व्यापारी येऊन विकत घेत होते.१९८८-८९ दरम्यान महात्मा फुले कृषी विद्यापीठाने राजमाचे काही वाणही विकसित केले. परंतु आता सिंचन सुविधा वाढल्याने पश्चिम महाराष्ट्रातही या पिकाखालील क्षेत्र कमी झाले आहे. बाजारपेठ हीच मुख्य अडचण हे पीक शाश्वत पर्याय ठरण्यामागे आहे.
- डॉ. एकनाथ वैद्य, कडधान्य विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
शेलगाव, शिरसाळा भागात पाच ते सहा वर्षे राजमा लागवड केली. २५ ते ३० एकरांवर लागवड शेतकरी करीत होते. ४५ हजार रुपयांचे उत्पन्न एकरी मिळायचे खर्च वजा जाता ३० ते ३२ रुपयांचा निव्वळ नफा होत होता. कोइमतूर येथून बियाणे आणले. या पिकाला खत अधिक द्यावे लागते. दरही चांगला मिळतो परंतु बाजारपेठेचा अभाव आहे. गव्हाला पाणी अधिक लागते, त्यामुळे गव्हाला पर्याय म्हणून आम्ही याकडे वळले होतो.
- डॉ. डी. एन. इंगोले, शेतकरी, शेलगाव बोदाडे, ता. मालेगाव, जि. वाशीम
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.