
कोल्हापूर : जिल्ह्यातील आजरा, चंदगड, राधानगरीसह इतर ठिकाणी हत्तीकडून (Elephant Rampage) होणाऱ्या नुकसानीसाठी (Crop Damage) तत्काळ मदत दिली जाणार आहे. शेती, प्रापंचिक साहित्य, कृषी अवजारे, घर किंवा वाहनांच्या मोडतोडीसाठी पाच हजार रुपयांपासून एक लाखांपर्यंत मदत दिली जाईल.
ज्या-त्या तालुक्यातील वनपाल, वनसंरक्षकांकडून याचा पंचनामा होईल. पंचनामा झाल्यावर २६ दिवसांत नुकसान भरपाईची रक्कम संबंधित व्यक्तीच्या नावावर जमा केली जाणार आहे. त्यामुळे नुकसान भरपाईसाठी आता वाट पाहावी लागणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड, भुदरगड, राधानगरीसह अभयारण्य परिसरांत हत्तीने नागरिकांचे जगणे अवघड करून ठेवले आहे.
दरम्यान, शासनाने अशा नुकसानग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी तत्काळ नुकसान भरपाई मिळावी, यासाठी नवीन आदेश दिले आहेत. यात नुकसानग्रस्तांना पाच हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई दिली जाईल.
शेती अवजारे, उपकरणे आणि बैलगाडीचे नुकसान झाल्यास पाच हजार रुपयांपर्यंत, तर संरक्षक भिंती व कुंपणाचे नुकसान झाल्यास दहा हजार रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय, एखाद्याचे कौलारू, सिमेंट, पत्र्याचे घर किंवा जनावरांच्या गोठ्याचे नुकसान केल्यास ५० हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणारी रक्कम मिळेल.
एखाद्या हत्तीने विटांच्या किंवा इमारतीच्या स्लॅबचे मोठे नुकसान केले असेल, तर एक लाख रुपयांपर्यंत रक्कम नुकसान भरपाई दिली जाणार आहे. ही नुकसान भरपाई मिळविण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रांसह नुकसानीची तक्रार आपल्या तालुक्यातील
वनरक्षक, वनपाल व वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांकडे करावी लागे
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.