
अमरावती ः खरीप हंगामात (Kharif Season) पावसाने दाणादाण उडाली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई (Compensation) देण्यात आली असताना अंतिम पैसेवारीकडे (Paisewari) शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या.
त्यानुसार अमरावती विभागातील ७२०८ गावांमध्ये पैसेवारी ४७ जाहीर करण्यात आली. त्यामुळे या गावांतील दुष्काळावर शिक्कामोर्तब झाले असून, दुष्काळी सवलती मिळणार आहेत.
अमरावती विभागात अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. संततधार पाऊस, अतिवृष्टी, तसेच पुरामुळे या पाचही जिल्ह्यांत सुमारे दहा लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. याकरिता शासनाने वाढीव निकषानुसार मदत जाहीर केली आहे. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना १,५४९ कोटींची मदत आतापर्यंत देण्यात आली आहे.
याशिवाय सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटी शासनाने १८० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. अशातच विभागात ५० पैशांच्या आत पैसेवारी जाहीर झाल्याने दुष्काळाच्या सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये जमीन महसुलात सूट, कृषी वीज वसुलीस स्थगिती, विद्यार्थांची परीक्षा फी माफ, रोजगार हमी योजनेची कामे आदींचा समावेश आहे. त्यासाठी मात्र शासन आदेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
...अशी आहे गावांची संख्या
अमरावती जिल्ह्यातील १,९५१ गावांमध्ये ४६, अकोला जिल्ह्यात १९० गावांत, यवतमाळमधील २०४६, वाशीम जिल्ह्यात ७९३ व बुलडाणा जिल्ह्यातील १४२० गावांमध्ये ४७ पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.